शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

पीकविमा योजनेचा लाभ संबंधित कंपन्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 21:39 IST

जिल्ह्यात यावर्षी खरीपाच्या धानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तालुक्यातील महागाव व नवेगावबांध परिसरात गारपीट व चक्रीवादळाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि उर्वरित पीक कडीकरपा व तुडतुडा रोगाने नेस्तनाबुत झाले.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शेतकरी दिंडी

ऑनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : जिल्ह्यात यावर्षी खरीपाच्या धानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तालुक्यातील महागाव व नवेगावबांध परिसरात गारपीट व चक्रीवादळाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि उर्वरित पीक कडीकरपा व तुडतुडा रोगाने नेस्तनाबुत झाले. तरी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. पंतप्रधान पीक योजनेचे निकष शेतकऱ्यांना डोके दुखी ठरत आहेत. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना नाही तर संबंधीत कंपन्यांसाठी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियानांतर्गत २२ व २३ फेब्रुवारी रोजी महागाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, पंचायत समिती सदस्य जनार्धन काळसर्पे, सुधीर साधवानी, युवा अध्यक्ष योगेश नाकाडे, डॉ. देशमुख, हुमणे, सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसची शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियान यात्रा २२ व २३ फेब्रुवारी रोजी महागाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत बुटाई नं. १, बुटाई नं. २, आदिवासीटोली, बोरी, सावरी, मांडोखाल, कोरंभीटोला, अरुणनगर, गौरनगर, कोरंभी, जानवा या गावातून भ्रमण करुन आल्यावर महागाव येथे जाहीर सभा घेण्यात आली.सभेत पुढे बोलताना चंद्रिकापुरे यांनी, शेतकऱ्यांबरोबर पीक परिस्थिती, दुष्काळ, पीक विमा योजना, वाढत असलेली महागाई व बेरोजगारी बाबद चर्चा करुन सध्याचे शासन कसे निष्क्रीय आहे हे समजावून सांगितले. तसेच राज्य शासनाने गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तिनच तालुक्यांचा मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात समावेश केला आहे. यावर्षी हमी भाव धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक घटली. धान उत्पादनात जिल्ह्यात ७ लाख क्विंटलने घट झाली. एवढे होऊनही दुष्काळ घोषित करण्यात शासन सकारात्मक नसल्याचेही ते म्हणाले.