शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 01:39 IST

तालुक्यात जलयुक्त शिवार व पाणलोट योजनेंतर्गत सन २०१५ मध्ये कामे करण्यात आली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची मध्यस्थी : २० तारखेपर्यंत माहिती देणारगोंदिया : तालुक्यात जलयुक्त शिवार व पाणलोट योजनेंतर्गत सन २०१५ मध्ये कामे करण्यात आली. भातखाचरच्या कामातील अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. केलेल्या कामांची माहिती ग्रामपंचायतला देण्यात यावी. माहिती अधिकारांतर्गत मागणाऱ्याला वेळेवर माहिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी ४ एप्रिलपासून उपोषण करण्यात आले. याची दखल तिरोड्याच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेवून समस्या जाणून घेतल्या. कृषी अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.जलयुक्त शिवार अभियान व पाणलोट योजनेंतर्गत भातखाचर व इतर कामे करण्यात आली. बरबसपुरा व काचेवानी या गावांत केलेल्या कामाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, कामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. काम न होताच बिल काढण्यात आले. शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत, याची माहिती जाणून घेण्याकरिता सदर माहिती ग्रामपंचायतला देण्यात यावी. तसेच माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यात यावी, यासाठी उपोषण करण्यात आले. उपोषणापूर्वी तिरोड्याचे तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी कार्यालयात बोलावून चर्चा घडवून आणली होती. परंतु तालुका कृषी अधिकारी लेखी माहिती देण्यास तयार नव्हते. शेवटी उपोषणावर बसण्याचा निर्णय घेण्यात आला. उपोषणादरम्यान सायंकाळी तिरोडा उपविभागिय अधिकारी प्रविण महिरे, तहसीलदार रविंद्र चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, झरारिया यांनी उपोषणस्थळी भेट देवून शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या. या वेळी तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले व इतर उपस्थित होते.याप्रसंगी प्रविण महिरे यांनी शेतकऱ्यांना माहितीस्तव कामे केल्याची नावे, रक्कम आदी माहिती ग्रामपंचायतच्या फलकावर जाहीर करण्यात यावी, गावात कृषी सहायकामार्फत शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारीचे निराकरण करण्यात यावे, माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती तत्काळ पुरवावी, बरबसपुरा व काचेवानी गावांची माहिती प्रथम द्या व नंतर इतर गावांची माहिती देण्यात यावे, असे निर्देश तालुका कृषी अधिकारी पोटदुखे यांना दिले. तसेच महिरे यांनी सांगितले की, दोन गावांची माहिती घेवून त्यात असणाऱ्या उणिवांची माहिती द्यावी, आम्ही त्यांना कदापि सोडणार नाही. तसेच जिल्हाधिकारी व वरिष्ठांना माहिती पुरवावी. त्याला आम्ही पाठिंबा देवून निश्चित सहकार्य करू, असेही म्हणाले.मात्र तालुका कृषी अधिकारी या वेळी माहिती अधिकाराची माहिती लेखी न देता अवलोकन करून देण्यात येईल, असे बोलून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करीत होते. पण उपोषणकर्ते तयार नव्हते. तेव्हा उपविभागीय अधिकारी महिरे, तहसीलदार चव्हाण व सहायक पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी माहिती अधिकाराची माहिती का देत नाही? असा प्रश्न करून माहिती देण्यास पोटदुखे यांना सांगितले. तिरोड्याचे सामाजिक कार्यकर्ते झरारिया यांनी उपस्थित अधिकारी व उपोषणकर्त्यांसमोर माहिती देण्यामागे कृषी विभागाला त्रास कसला, यावर रोष व्यक्त केला. तसेच माहिती देण्याची निश्चित तारिख देण्यात यावी अन्यथा मागण्या पूर्ण करण्याचे लेखी उत्तर द्यावे. मागण्या वाजवी असून त्या पूर्ण कराव्यात, असा पवित्रा त्यांनी धरला. मात्र शेवटपर्यंत लेखी माहिती व दस्तावेज देण्यास तालुका कृषी अधिकारी टाळाटाळ करताना दिसून आले.यानंतर तालुका कृषी अधिकारी पोटदुखे यांनी उपविभागीय अधिकारी महिरे, तहसीलदार चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मध्यस्थीने लेखी निवेदन देवून मागण्यांवर २० तारखेपर्यंत सहानुभूतिपूर्वक विचार करण्यात येईल व मागितलेली माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)अंदाजपत्रकात सुधार होण्याची शक्यतासविस्तर अंदाजपत्रक (डीपीई) देण्यास दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. दोन गावांची (काचेवानी व बरसबपुरा) माहिती मागील पाच ते सहा महिन्यांपासून मागितली जात आहे, तरी ती दिली जात नाही. आताही १५ दिवसांचा वेळ मागण्याचे कारण काय? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. यात काही सुधारणा तर करण्यात येणार नाही, सुधारणा करण्यात आली तर सत्य माहिती समोर येईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.