शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

धरणे आंदोलनकर्त्यांवर मधमाशांचा हल्ला

By admin | Updated: March 7, 2017 00:56 IST

आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले.

जीवन प्राधिकरण : पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यतागोंदिया : आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले. दरम्यान तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीवरील मधमाशांचे पोळ उठले आणि मधमाशांनी या कर्मचाऱ्यांच्या दिशेने मोर्चा वळविला. त्यामुळे घाबरलेले अधिकारी कर्मचारी पेंडॉल सोडून आपल्या कार्यालयात दार बंद करून बसले. या गडबडीत दोन कर्मचारी जखमी झाले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी-कर्मचारी आपल्या वेतन-भत्त्याचे अनुदान शासनाकडून मिळविण्याच्या मागण्यांसाठी ४ मार्चपासून धरणे आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर कार्यालयात आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामूहिक रजा घेतली आहे. गोंदिया येथील मजीप्रा कार्यालयासमोर ५ मार्चपासून पेंडाल घालून सर्व कर्मचारी बसले होते. तेवढ्यात अचानक दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मधमाशांच्या एका समुहाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले. तर उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरातच तीन उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता व बिल भरण्याचे कार्यालय आहे. या सर्व कार्यालयांचे बंद दार-दरवाजे उघडण्यात आले व सर्व अधिकारी कर्मचारी जवळपास एक तासपर्यंत त्यात लपून राहिले. यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा सदर पेंडालमध्ये आपली उपस्थिती लावणे सुरू केले. पुन्हा मधमाशांनी येणे सुरू केले, त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांना कार्यालयात आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे पेंडॉल सामसूम होता.सध्या या आंदोलनात निशीकांत ठोंबरे, राजेंद्र मडके, प्रदीप वानखेडे, विकास दिवारे, आर.एन. खैरे, जी.पी. खापेकर, जी.यू. धारकर, पी.एम. वाघाये, आर.वी. चौडलवार, भरत परतेती, अनूप निमजे, बी.एन. रामटेके, एन.जी. अरखेल, एच.के. नागपुरे, एन.एम. सैयद, जे.डी. लिल्हारे, आर.सी. चित्रीव, एन.एन. देशमुख, पी.जी. बिसने, जी.यू. सुपारे, रविकांता डोंगरे व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पाणी पुरवठ्यावर परिणामाची शक्यतामजीप्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी १ ते ५ मार्चपर्यंत कार्यालयात काळ्या फिती लावून काम करीत होते. ५ मार्चच्या पहाटे १ वाजतापासून कामबंद आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात सर्व अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प होण्याची शक्यता होती. ५ मार्चच्या सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही, अशी शक्यता वाढली होती. परंतु रात्री ९ वाजतादरम्यान पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. या संदर्भात मजीप्राचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांनी सांगितले की, संघटनेच्या वतीने कसलीही सूचना प्राप्त झालेली नाही. माजी आमदारांचे समर्थनआंदोलनकर्त्यांच्या पेंडॉलमध्ये तिरोडा येथील माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी सोमवारी जाऊन मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना आपले समर्थन जाहीर केले. यादरम्यान त्यांनी आंदोलनाच्या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून माहितीही जाणून घेतली.