शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सौंदर्य आहे, सौंदर्यीकरणाचा अभाव

By admin | Updated: July 12, 2014 23:43 IST

बाकटी गावात सौंदर्यीकरणासाठी बराच वाव आहे. शाळा, देऊळबोडीच्या सौंदर्यीकरणाची ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केली जाते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या गावची स्थिती जैसे थे आहे.

दत्तक ग्राम योजना : गावात विकास कामे झालीच नाहीसंतोष बुकावन - अर्जुनी/मोरगावबाकटी गावात सौंदर्यीकरणासाठी बराच वाव आहे. शाळा, देऊळबोडीच्या सौंदर्यीकरणाची ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केली जाते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या गावची स्थिती जैसे थे आहे. दत्तक ग्राम योजनेनंतरही ग्रामविकासात कसलेच परिवर्तन दिसून येत नसल्याचे गावकरी सांगत आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आ.राजकुमार बडोले यांनी बाकटी या गावाला दत्तक घेतले. या गावची लोकसंख्या १९०६ आहे. या गावात २७१ कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत. हे गाव निर्मलग्राम व तंटामुक्त पुरस्कारप्राप्त आहे. मात्र क्षुल्लक कारणावरुन उद्भवणारे वादविवाद हे नित्याचे आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काहीशा प्रमाणात कामे झाली असली तरी अद्यापही वर्षातून प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबाला किमान १०० दिवस रोजगार देण्यात हे गाव यशस्वी होऊ शकले नाही. या गावातील मुख्य व्यवसाय शेती व मजूरी आहे. या गावातील सुमारे ५० कुटुंब तेंदूपत्ता हंगामात रोजगारासाठी स्थलांतर करतात. विहिरी, हातपंप व नळयोजना अस्तित्वात आहे. तरीसुद्धा उन्हाळ्यात अंशत: नळयोजनेचे पाणी दररोज उपलब्ध होत नाही.तालुक्यातील या मार्गावर मोठी गावे असली तरी अद्यापही या गावांची तालुका मुख्यालयाशी वाहतुकीच्या दृष्टीने नाळ जुळलेली नाही. मानव संसाधन योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेनिमित्ताने बस सुविधा उपलब्ध आहे. या गावातील शेतजमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळे झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली आहे. प्रामाणिक प्रयत्न झाल्यास येथे सिंचन सुविधा उपलब्ध करण्यास मुळीच अडचण नाही. वन जमिनीवरील केवळ सहा अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले. अद्यापही मोठ्या प्रमाणावर गावकरी पट्टे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या साडेचार वर्षात बौद्ध विहारासाठी सुरक्षा भिंत व चावडी बांधकाम एवढीच कामे आमदार निधीतून झाली असल्याची माहिती उपसरपंचांनी दिली.या गावात सरपंचांचे पद रिक्त आहे. उपसरपंचांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आ. बडोले हे गावात केवळ कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात. आतापर्यंत ते ३ ते ४ वेळेला आले. दत्तक गावाच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण कामे या गावात झाली नाही. नेहमीप्रमाणे जशी साधारण विकासकामे होतात तशीच कामे झाली. ग्रामपंचायततर्फे सुचविण्यात आलेल्या विकासकामांकडे आमदारांनी लक्ष दिले पाहिजे. याशिवाय दत्तक ग्राम योजनेच्या सभेत सुचविण्यात आलेली कामे अद्यापही प्रलंबित आहेत. त्या कामांना प्राधान्यक्रम दिले पाहिजे. नवेगावबांध, दिघोरी मोठी, अड्याळ या मार्गावर वाहतूक सुविधा, छगन मांढरे ते पाण्याची टाकीपर्यंत ७०० मीटर रस्त्याचे बांधकाम, बाजार चौक व शामराव वडगाये यांच्या घरासमोर हातपंप, गावसीमेवर स्वागतद्वार व बाकटी येथे पोलीस चौकी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदारांच्या दत्तक ग्राम सभेत गावविकासाच्या दृष्टीने आठ समस्या मांडण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळेला आवारभिंतीची मागणी होती. ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. शाळेला ताराचे कुंपण आहे. दर्शनी भागात आवारभिंत आहे. शाळेच्या मागील भागात क्रीडांगणात आवारभिंत आहे. शाळेच्या मागील भागात क्रीडांगणात आवारभिंत नाही. सांस्कृतिक भवनाचे काम खासदार निधीतून सुरू आहे. ग्रा. पं.च्या वतीने जनसुविधा योजनेतून स्मशान शेड व विंधन विहिरीचे बांधकाम सुरू आहे. वॉर्ड क्र. ३ मधील बारकू बोरकर यांचे घराजवळील विहिरीचे पुनर्निर्माण काम अद्यापही झालेले नाही. ग्रामपंचायतनजीकच्या देऊळबोडी येथे पाणघाटाची प्रमुख मागणी होती. ही साडेचार वर्षात कार्यान्वित होऊ शकली नाही. साकोली ते अर्जुनी/मोरगाव मार्गे गुढरी, बाकटी, चान्ना, सोमलपूर या एसटीच्या दोन फेरीमध्ये मागणी केली होती. मात्र विद्यार्थ्यांसाठी म्हणून गावात बस येते. जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने बससेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे मात्र निकाली काढण्यात आली. एकंदरित दत्तक ग्राम योजनेच्या दृष्टीने या गावात विकासकामे झालीच नसल्याचा सूर व्यक्त करण्यात येत आहे.