शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तलावाचे सौंदर्यीकरण रखडले

By admin | Updated: May 2, 2015 01:47 IST

येथील रेल्वे स्थानक व भीमनगर दरम्यान विस्तीर्ण असे रेल्वे तलाव पसरले आहे.

गोंदिया : येथील रेल्वे स्थानक व भीमनगर दरम्यान विस्तीर्ण असे रेल्वे तलाव पसरले आहे. सध्या या तलाव परिसरात शहरातील घाण व कचरा घातला जातो. त्यामुळे दोन मिनिटेसुद्धा येथे थांबणे कठिण झाले आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव मागील पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या प्रस्तावावर कसलीही कार्यवाही झाली नसल्याचेच समजून येते. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम राज्य शासन करणार होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक झाली होती. त्यात सदर तलावाच्या सौंदर्यीकरणावर चर्चा होवून तसा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. गोंदिया रेल्वेला मिळालेल्या त्या प्रस्तावाची प्रत नागपूर डीआरएम कार्यालयाला पाठविण्यातही आली होती. मात्र सदर काम राज्य शासनाकडून होणार असल्याने पुढे काय झाले, याविषयी काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकाराला आता पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही सौंदर्यीकरण तर दूरच साधी सुधारणासुद्धा या तलावाची करण्यात आली नाही. यामागे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उदासिनता असल्याचे बोलले जाते. सध्या या तलाव परिसरात शहरातील प्लास्टिक, पॉलिथिन, केरकचरा, घाण घातली जाते. त्यामुळे येथे नेहमीच डुकरांचा वावर राहत असून दुर्गंधाने ये-जा करणाऱ्यांना कासाविस झाल्यासारखे वाटते. उन्हाळा लागल्यावरही या तलावात पाणी आहे. परंतु ते पाणी घाणीमुळे खराब झाले आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून या तलावाचे सौंदर्यीकरण केले तर तेथे एक उत्तम प्रेक्षणिय स्थळ बनू शकते. विद्युत प्रकाशाची व्यवस्था, तलाव परिसरात बगिचा, परिसराची स्वच्छता, नागरिकांच्या बसण्यासाठी सिमेंट खुर्च्यांची सोय, तलाव व तलाव परिसरात घाण व कचरा साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्यास या तलावाचे सौंदर्य फूलेल. शिवाय शहरातील नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी किंवा विसाव्यासाठी येथे येवू शकतील. एकंदरीत हे तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरू शकेल. मात्र पाच ते सहा वर्षांच्या काळात तीन ते चार जिल्हाधिकारी बदलून गेले. या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शिवाय लोकप्रतिनिधी व अनेक पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणीही हा मुद्दा उचलून धरला नाही. त्यामुळे या रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरणच विस्मरणात गेल्याचे दिसून येते. सध्या हे तलाव परिसर कचऱ्याचे माहेरघर असून डुकरांचे आश्रयस्थान बनले आहे. पूर्वी या तलावातील पाण्यावर हिरवे शेवाळ पसरले होते. त्यामुळे तलावातील पाणी दिसत नव्हते, केवळ वरून हिरवेगार शेवाळच दिसून येत होते. यानंतर या तलावाची एकदा स्वच्छता करून ते शेवाळ काढण्यात आले होते. मात्र त्यानंतर या तलावाच्या कामाकडे सातत्त्याने दुर्लक्ष करण्यात आले. (प्रतिनिधी)