शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सावधान! वृद्धांमध्ये वाढतोय अल्झायमर...

By admin | Updated: September 20, 2014 23:52 IST

बदललेली जीवनशैली, घरातील प्रत्येक व्यक्तीचे आत्मकेंद्रित होणे आणि त्यातून घरातील वृद्धांच्या वाट्याला येत असलेले एकाकीपण यातून सध्या ‘अल्झायमर’ हा आजार वृद्ध नागरिकांमध्ये बळावत आहे.

दिन विशेष : विसरभोळेपणामुळे होतात त्रस्त, आजार टाळण्यासाठी राहा कार्यक्षमगोंदिया : बदललेली जीवनशैली, घरातील प्रत्येक व्यक्तीचे आत्मकेंद्रित होणे आणि त्यातून घरातील वृद्धांच्या वाट्याला येत असलेले एकाकीपण यातून सध्या ‘अल्झायमर’ हा आजार वृद्ध नागरिकांमध्ये बळावत आहे. आधी पाश्चिमात्य देशातच आढळणारा हा आजार आता भारतासारख्या देशातही हळूहळू पाय पसरत आहे. विसरभोळेपणा हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. साधारणत: वयाच्या सत्तरी-पंचाहत्तीनंतर या आजाराची लक्षणे दिसून लागतात. या आजारात स्मृतिभ्रंश होतो. अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितलेली गोष्टही त्यांना आठवत नाही. आपण जेवन केले का, कपडे घातले का किंवा बाहेर फिरायला गेलो तर घरी जाण्याचेही ते विसरू शकतात. अनेक वेळा तर स्वत:चे नाव आणि पत्ताही ते विसरतात. त्यामुळेच अशा रुग्णांच्या खिशात नेहमी त्यांचे नाव आणि पत्ता असलेली डायरी किंवा चिठ्ठी ठेवावी लागते. सध्या मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोनमुळे प्रत्येकाचे आयुष्य आत्मकेंद्रीत होत आहे. युवकांसोबत मोठ्यांपर्यंत सर्वच जण आपापल्या विश्वात रमताना दिसतात. त्यामुळे घरातील म्हाताऱ्या व्यक्तींसोबत बोलायला, त्यांचे सुख-दु:ख जाणून घेण्याचीही कोणाला फुरसत नसते. यामुळेच ही म्हातारी मंडळी एकाकी होऊन जातात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कार्यरत राहात नसल्यामुळे अखेर त्यांना हा आजार जडतो. या आजारात मेंदूच्या पेशी कमजोर होतात. त्यात आकुंचन पावतात. यात शरीर काम करीत असले तरी मेंदू काम करीत नाही. विशेष म्हणजे यावर कोणतीही औषधी काम करीत नाही. जी काही औषधी उपलब्ध आहे ती अतिशय महागडी असून ती सुद्धा काम करेलच याची शाश्वती नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. (जिल्हा प्रतिनिधी)