शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

बीसी कांदा देतोय १२ गावातील कुटुंबांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:21 IST

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान सुपरिचीत आहे. या राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग वैभव संपन्न ऐतिहासीक मालगुजारी तलावातील बीसी कांदे हे मागील ५० वर्षांपासून तलावात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. या बीसी काद्यांमुळे १२ गावातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । हजारो कुटुंबांना मदत, तलावात होतात तयार, बाजारपेठेत मोठी मागणी

रामदास बोरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान सुपरिचीत आहे. या राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग वैभव संपन्न ऐतिहासीक मालगुजारी तलावातील बीसी कांदे हे मागील ५० वर्षांपासून तलावात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. या बीसी काद्यांमुळे १२ गावातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे तलावात तयार होणारे नैसर्गिक बीसी कांदे या गावातील नागरिकांसाठी एकप्रकारचे वरदानच ठरत आहे.पोवन कांद्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. स्थानिक लोक याला बीसी कांदे म्हणून ओळखतात. महाराष्ट्रात इतर ठिकाणी पोवन कांदा, कमळकंद, छत्तीसगडमध्ये ढेस या नावाने ओळखले जाते. ४०-५० वर्षापूर्वी शेतीशिवाय दुसरा रोजगाराच नव्हता. लोकांना शेतीतून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातूनच कुटूंबाना उदरनिर्वाह करावा लागत होता. मात्र ते सुध्दा पुरेसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे परिसरातील शेतकरीबांधव बीसी कांदा, जंगलातील मोहफुले मीठ टाकून उकडून, भाजून आपली भूक भागवित होते. भाजी करणे, वाळवण(खुला) करुन ठेवायचे. तसेच चिंचोळे,जंगलातील कडूकांदा, नाना माती कांदा, आणि तलावातील शिमनीफुल कांदा, गाद कांदा यासारखे कंदमूळे खाऊन स्थानिक व आदिवासी आपला उदरनिर्वाह करायचे. नवेगावबांध मालगुजारी तलावाच्या सभोवताल असलेल्या दुर्गम आदिवासी क्षेत्रातील जांभळी, येलोडी, रामपुरी, पवनीधाबे, राजीटोला, कान्होली, तिडका, पांढरवाणी, खोली, बोंडे, मुंगली, नवेगावबांध या १२ गावातील मासेमारी करणारे ढीवर समाजबांधव व इतर लोकांच्या उदरनिर्वाहाचे हे बीसी कांदे एक प्रमुख साधन बनले आहे. मार्चपासून ते जूनपर्यंत (पावसाला सुरूवात होईपर्यंत) हा कमळकंद तलावातून खणून काढून त्याची विक्री केली जाते.१९९५ पासून झाली विक्रीस सुरुवातपूर्वी अन्न म्हणून वापरात असलेल्या या बीसी कांद्याची विक्री १९९५ पासून सुरु झाली. तेव्हापासून हे बीसी कांदे या परिसरातील लोकांना चार महिने रोजगार मिळवून देण्याचे साधन झाले आहे. त्या वेळी पवनीधापे येथील धनराज नंदेश्वर, महादेव नंदेश्वर, चुडामन सोनवाने यांनी या कांदा खरेदीला सुरुवात केली. दोन रुपये प्रती किलो पासून खरेदी-विक्री केली जायची. आता बीसी कांदा २० रुपये प्रती किलो दराने खरेदी करुन त्याची जिल्ह्यातील बाजारपेठेत ३० ते ४० रुपये प्रती किलो प्रमाणे विक्री केली जाते. गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रायपूरसह छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात या कांद्याला मोठी मागणी आहे. चंद्रपूर व गोंदिया येथील व्यापारी परिसरात हा बीसी कांदा खरेदी करतात. २०११ ला वनविभागाने या कांद्याच्या खाण्यावर आणि तलावातून कांदे काढण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा तलावातून कांदे काढायला सुरुवात झाली.महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचे उत्पन्नबीसी कांद्यामुळे या परिसरातील हजारो कुटूंबाना रोजगार मिळाला आहे. महिला दररोज तलावातून १० ते १५ किलो कांदे काढून २५० ते ३०० रुपये तर पुरुष मंडळी २० ते ४० किलो कांदे काढून ७०० ते ८०० रुपये कमवितात. मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधीत १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न एका कुटुंबाला मिळते.मासेमारी करणाऱ्या समाजाची उपजिवीका या तलावावर अवलंबून आहे. गोड्या पाण्यातील जैवविविधतेचे प्रचंड ज्ञान या समाजाकडे आहे. बीसी कांदे खणून काढल्यामुळे खड्डे तयार होतात. पावसाळ्यात याचा उपयोग वाघुर, दांडक यासारखे मुलकी मासे अंडी घालण्यासाठी करतात. दरवर्षी कमळकंद काढल्यामुळे ही वनस्पती बेसुमार तलावात वाढत नाही. त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींना धोका नाही.ग्राम पंचायत पातळीवरील जैवविवधता समित्यांनी संवर्धनाची जबाबदारी घ्यावी.- नंदलाल मेश्राम, पर्यावरण मित्र,जांभळी.