शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

उतरवले बॅनर, पावत्याही फाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 02:13 IST

शहरात सर्वत्र अनियंत्रित आणि नियमबाह्यरित्या लागलेल्या बॅनरबद्दलचे सचित्र वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली.

गोंदिया : शहरात सर्वत्र अनियंत्रित आणि नियमबाह्यरित्या लागलेल्या बॅनरबद्दलचे सचित्र वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. या बॅनरमुळे शहराच्या विद्रुपतेत भर पडण्यासोबतच नगर परिषदेला वर्षाकाठी किमान ७ लाख रुपयांचा फटका बसत असल्याचा हिशेबच लोकमतने सादर केला. त्यामुळे नगर परिषदेच्या परवाना विभागाने तातडीने बॅनरबाजांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. शनिवारी १४ बॅनर उतरविले तर १७ बॅनरधारकांची रितसर पावती फाडण्यात आली. शहरात ३०० पेक्षा जास्त बॅनर्स लागलेले असताना प्रत्यक्षात अवघ्या १० पावत्या फाडणाऱ्या नगर परिषदेच्या परवाना विभागाला शनिवारी लोकमतच्या वृत्तानंतर कारवाई करण्यासाठी एकाच दिवशी ३० पेक्षा जास्त बॅनर्स नजरेस पडले. सोमवारीही कारवाई सुरू राहणार असल्याचे परवाना निरीक्षक प्रदीप घोडेस्वार यांनी सांगितले. मात्र अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बॅनर्सवर या विभागाकडून कारवाई होणार का? याबाबतची शंका अजूनही कायम आहे.खासदार-मंत्र्यांच्या नावाने लागलेल्या बॅनर्सचीही पावती फाडलेली नसल्याची बाब लोकमतने निदर्शनास आणून दिल्यानंतर शनिवारी तातडीने खासदार नाना पटोले, ना.राजकुमार बडोले यांच्या बॅनर्सची पावती फाडण्यात आली. त्यामुळे त्यांचे बॅनर्स कायम आहेत. मात्र नेहरू चौकातील उड्डाण पुलावर लागलेले बॅनर्स उतरविण्यात आले. त्यात सारस महोत्सवासंदर्भातील एका शासकीय बॅनरलाही उतरवावे लागले. (जिल्हा प्रतिनिधी)विद्रुपतेला पदाधिकारीच जबाबदारन.प.चे निरीक्षक घोडेस्वार आपली अडचण सांगताना म्हणाले, नगर परिषदेचे पदाधिकारी किंवा आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या बॅनर्सवर कारवाई करण्यासाठी गेल्यास ते दुसऱ्यांकडे बोट दाखवून आधी त्यांचे बॅनर काढा, मग माझ्या बॅनरला हात लावा, असे म्हणून सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे शहराचा चेहरा विद्रुप होत आहे. मात्र उच्च न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे कारवाई करणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही काय तो निर्णय घेऊ, असे घोडेस्वार म्हणाले.शेवटी जबाबदारी कोणाची?शहराच्या विद्रुपीकरणासोबतच उच्च न्यायालयाच्या निर्देशांची अवहेलना होऊ नये, वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा होऊ नये, नगर परिषदेचा बुडणारा कर वसूल व्हावा अशा विविध कारणांसाठी नियमबाह्य बॅनर्सवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. पण ही समस्या ‘कळते पण वळत नाही’ अशी झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन नगर परिषदेला योग्य ते निर्देश देऊन शिस्त लावावी, अशी अपेक्षा शहरवासीय करीत आहेत.वाटेल तिथे आणि वाटेल त्या पद्धतीने शहरात लागलेल्या बॅनर्समुळे वाहतुकीस निश्चितच अडथळा होतो. कोणत्याही बॅनरला परवानगी देताना ते कुठे आणि कशा पद्धतीने लावले जाणार आहे हे ठरविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाची परवानगी घ्यावी. कारण काही बॅनर्स कमी उंचीवर आणि चुकीच्या ठिकाणी लागतात. त्यामुळे वाहनधारकांना समोरचे वाहन दिसणे अशक्य होते. यासंदर्भात न.प. मुख्याधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिले आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडेही त्यासंदर्भात एक अहवाल मे महिन्यातच दिला आहे. पण नगर परिषदेकडून प्रतिसाद मिळाला नाही.- किशोर धुमाळपोलीस निरीक्षक, वाहतूक शाखाविजेच्या खांबांवर बॅनर लावणे बेकायदेशीर आहे. नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या विजेच्या खांबांवरील बॅनर्स काढण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. आम्ही यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन हे बॅनर्स तत्काळ काढावेत असे सुचविले. त्यासाठी आमचे कर्मचारी पूर्ण सहकार्य करतील. त्या पत्राची पत्र जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली आहे. पण न.प.कडून अद्याप कारवाई झालेली नाही. यामुळे कधी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- कबीरदास चव्हाणअधीक्षक अभियंता, महावितरण