शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

बँक कर्मचाऱ्यांचा राष्ट्रव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 00:20 IST

शासनाकडून जन विरोधी बँकींग सुधार व ट्रेड युनियन अधिकारांच्या उल्लंघनाचे प्रयत्न केल्याच्या विरोधात

संपामुळे कामकाज ठप्प : मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने गोंदिया : शासनाकडून जन विरोधी बँकींग सुधार व ट्रेड युनियन अधिकारांच्या उल्लंघनाचे प्रयत्न केल्याच्या विरोधात तसेच विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने मंगळवारी (दि.२८) राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला. या बंदमध्ये सर्व शासकीय बँकांचा समावेश होता. परिणामी बँकांचे कामकाज ठप्प पडले होते व त्यामुळे सामान्य नागरिकांची पंचाईत झाली होती. नोटबंदी दरम्यान कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळे नंतरही केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्यात यावा, सर्व बँकांत कर्मचारी व अधिकाऱ्यांची त्वरीत नियुक्ती करण्यात यावी, बँक कर्मचाऱ्यांच्या आगामी वेतत पुनरीक्षणाची प्रक्रीया त्वरीत सुरू करावी, पूर्वीची पेंशन योजना लागू करावी, केंद्र शासनानुसार राज्य शासनाकडून स्वीकृत अनुकंपा नियुक्ती योजना लागू करावी, सर्व संवर्गातील भर्ती करण्यात यावी, नोटबंदीच्या काळात बँकांकडून करण्यात आलेल्या खर्चाची शासनाकडून पूर्तता करण्यात यावी, पाच दिवसीय बँकींग त्वरीत सुरू करावी, जाणून बँक कर्जाची परतफेड न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आदी मागण्यांसाठी युनाईटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने मंगळवारी (दि.२८) हे राष्ट्रव्यापी संप पुकारला होता. या संपात सर्वच शासकीय बँकांचा सहभाग होता. त्यामुळे खासगी बँकांना सोडून अन्य शासकीय बँकांना कुलूप लागले होते. संप दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी आपापल्या बँकापुढे एकत्र येवून बैठका घेतल्या. यात बँक आॅफ इंडियाच्या रेलटोली स्थित मुख्य शाखेसमोर कर्मचारी व अधिकारीही एकत्र आल्याचे दिसून आले. यात येथील बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर मुख्य व्यवस्थापक सुरेशकुमार त्रिवेदी, संघाचे अध्यक्ष जी.भास्करराव, सचिव चंद्रप्रकाश रूहीया, रूपचंद तळवेकर, खुशाल नेवारे, रूपेश चव्हाण, सी.टी.साखरे, ए.टी.कटरे, जे.जी.शिंदे, ललीत रहांगडाले, डी.बी.राऊत, रोशन भोयर, अमोल खोब्रागडे, रितेश पांडे, जी.पी.पिंपरे व अन्य उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना फटका बॅकांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाला मात्र फटका सहन करावा लागला. सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार संपामुळे प्रभावीत झाले. मात्र व्यापाऱ्यांचे व्यवसायीक आर्थिक व्यवहार अडकल्याने त्यांना जास्त त्रास सहन करावा लागला. संपामुळे बँका बंद ठेवण्यात आल्या व त्यामुळे नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. कित्येक बँकांनी गेटवर बँक बंदची सूचनाही लावलेली दिसले.