शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कर्ज देण्यास बँकेची वर्षभरापासून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:00 IST

शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही.

ठळक मुद्देलाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : कारवाही करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांने याची तक्रार जिल्हाधिकारी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडे केलीे आहे.प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील तिगाव येथील रहिवासी अरुण पोंगळे यांनी वर्षभरापूर्वी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शेळी पालन व्यवसायाकरिता कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. तेव्हा बँक व्यवस्थापनाने पोंगळे यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यास व यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण घेवून व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र यानंतरही बँकेने त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याच गावातील तीन लाभार्थ्यांना मागील वर्षभरापासून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.मागील वर्षभरापासून कर्ज न मिळाल्याने पोंगळे यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. एकीकडे शासन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा लोण योजना राबवित आहे.तर दुसरीकडे कर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन सुध्दा कर्ज देण्यास बँकाडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाही करण्याची मागणी अरुण पोंगळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यव्यवस्थापक, ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडिया