शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामासाठी एक महिन्यापासून गिट्टी पडून, मात्र कामाला सुरुवात केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:07 IST

Gondia : आमगाव-सालेकसा मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; खड्डे बुजविण्याचे काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : आमगाव-सालेकसा- दरेकसा मार्गाच्या दुरवस्थेकडे वारंवार शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर या मार्गाचे एकूण पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. त्यासाठी गिट्टी आणि बजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आली आहे. परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून आमगाव- सालेकसा मार्गाची पुनर्बाधणी किंवा दुरुस्ती झाली नसल्यामुळे या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. याची वारंवार तक्रार केल्यानंतर आणि बातम्या प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम अधूनमधून केले. रस्त्यावरील खड्डे मुरूम मातीने बुजविण्यात आले. परिणामी आठ दिवसांतच रस्त्याची अवस्था 'जैसे थे' झाली. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच होते. अनेक अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली

आणि आमगाव ते दरेकसा दरम्यान पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. यात कावराबांध ते गोवारीटोला दोन किलोमीटर, पानगाव तलाव ते रॉढा एक किलोमीटर तसेच सालेकसा ते दरेकसा दरम्यान अर्धा अर्धा किलोमीटर वेगवेगळ्या ठिकाणी दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. असे एकंदरीत पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीसाठी गिट्टी आणि बजरी चुरी टाकण्यात आली. परंतु गिट्टी बजरी चुरी टाकल्यापासून एक महिना लोटला तरी प्रत्यक्षात रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाला नाही. गिट्टी बजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेसुद्धा अपघात होऊ लागले. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस जीवघेणे होऊ लागल्याने प्रवाशांचा त्रास आधीपेक्षा तीन पट वाढल्याचे चित्र आहे. रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असताना ते म्हणाले की रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. परंतु दुरुस्तीचे काम करण्यासाठी लागणारे मजूर वर्ग मिळत नसल्याने कामास विलंब होत असल्याचे सांगितले.

एवढ्या मोठ्या कंत्राटदाराला मजुरांची अडचण का?आमगाव-सालेकसा-दरेकसा रस्ता दुरुस्तीचे काम वालिया अँड सन्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र, ही कंपनी रस्ता दुरुस्तीसाठी मजूर मिळत नसल्याचे सांगत कामास विलंब करीत आहे. मात्र, याचा फटका वाहन चालक आणि गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

खड्डे बुजविण्याची गरजरस्ता दुरुस्तीचे काम सुरू होत आहे म्हणून खड्डे बुजविण्याचे कामसुद्धा थांबविण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होताना दिसत नाही तर दुसरीकडे खड्यांची संख्या वाढत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे फार जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. परंतु बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार याकडे गांभीर्याने विचार करीत नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा