शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

बळीराजाची ‘बरसो रे मेघा’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच बळीराजा बरसो रे मेघा मेघाची हाक देत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी दुबार पेरणीच्या संकटात वाढ : पेरण्या पुन्हा खोळंबल्या, यंदा १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाचे

नियोजनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहे. तर काही शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच बळीराजा बरसो रे मेघा मेघाची हाक देत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर आणि एक दोनदा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. मात्र यंदा मृगाच्या सरी दमदार बसरल्या नाही. तर जवळपास २० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या पडल्या आहेत.जून महिन्यात एक दोनदा जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी वेळेत पेरणीची कामे पूर्ण केली आहे. मात्र बºयाच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री न करता आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. तर आता वरुण राजाने देखील त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एकूण १४ हजार हेक्टरवर पऱ्हे टाकून पूर्ण झाले आहे.तर अजून बऱ्याच प्रमाणात पेरणी होणे शिल्लक आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ नाकारता येत नाही. त्यामुळे बळीराजासह जिल्ह्यावासीयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पाऊस लांबल्याने तूट वाढलीजिल्ह्यात यंदा मृगाच्या सरी दमदार बरसल्या नाही तर त्यानंतरचे पावसाचे नक्षत्र सुध्दा कोरेड गेले. पाऊस लांबत असलेल्या पावसाची तूट सुध्दा वाढत आहे. जिल्ह्यात २८ जूनपर्यंत सरासरी १५०.७६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी १३२७ मिमी पाऊस पडतो. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाची तूट वाढत चालल्याने पाऊस यंदा सरासरी गाठणार की नाही अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित आहे.नदी नाल्यांना ही पावसाची प्रतीक्षारविवारी जिल्ह्यात ७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली. यात गोंदिया शहरातील कुंभारेनगर,फत्तेपूर, डोंगरगाव, या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ कंटेन्मेंट झोन आहेत.जिल्ह्यात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रीय झालेला नाही. हवामान विभागाने सुध्दा येत्या सात आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. पेरणी आणि पºह्यांसाठी पाऊस गरजेचा आहे. आठ दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेती