शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

महागाई विरोधात बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:51 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसंविधान बचाव देश बचावचा नारा : काँग्रेसने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते.मोर्चा निघण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा घेण्यात आली. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, माजी जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे, राजेश नंदागवळी, डॉ. योगेंद्र भगत, पं. स. उपसभापती माधुरी हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालिसंग गुलाटी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खºया अर्थाने लोकशाहीची स्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम आहे. मात्र केंद्र व राज्यातील सरकार वारंवार संविधान बदलण्याचे भाष्य करीत आहे. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. भाजपा सरकार केवळ देशातील जनतेला आश्वासने देवून त्यांची फसवणूक करीत आरोप कोरोटे यांनी केला. वाढत्या महागाई, बेरोजगारी, शेतमालाल कमी दर यासह महत्वपूर्ण समस्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची फरफट होत असल्याचे सांगितले.पुरूषोत्त कटरे यांनी सुध्दा भाजप सरकार जोरदार टिका केली. केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. अर्थसंकल्पात देखील केवळ २०१९ मधील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घोषणा केल्या. त्या सुध्दा पूर्ण होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा या वेळी मार्गदर्शन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. पेट्रोल व डिझलची दरवाढ, वाढती महागाई, शेतमालाल मिळणारा अल्प दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर मोर्चेकरी बैलबंडीनेच एसडीओ कार्यालयात पोहोचले. कटरे यांच्या नेतृत्त्वात विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. त्यानंतर मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपावर जोरदार टीका व हल्लाबोल केला. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले व आभार संकेश तिवारी यांनी मानले. यावेळी नगरसेवक राकेश ठाकूर, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, संदीप ठाकूर, सुशिल रहांगडाले, संकेश तिवारी, शेषराव गिऱ्हेपुंजे, विकास बंसल, देवेंद्र अग्रवाल, गुड्डू ठाकूर, देवा रूसे, संदीप रहांगडाले, नगर कॉग्रेसचे अध्यक्ष बलिजतिसंग बग्गा, सौरभ शर्मा, व्यंकट पाथरू, कुरमराज चौहान, देवा रूसे, भागवत मेश्राम, अ‍ॅड. योगेश अग्रवाल यांचा समावेश होता.