शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

पिशव्या पर्यावरणास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:58 IST

रवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना...

जनावरांचे आरोग्य धोक्यात : प्लास्टिकच्या बंद पिशव्यात खाद्यपदार्थांची विक्री जोमातलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. यावेळी अस्तित्वात असलेल्या खाद्य पदार्थांची पॅकिंग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सीलबंद प्लास्टिक पिशव्यात केली जाते. या खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव्या प्रत्येक ठिकाणी साचतात. गावच्या परिसरात मोठ्याने अस्तव्यस्त पसरल्याचे त्या दिसतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्लास्टिक वस्तुचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वस्तुंची उधळपट्टी करण्यात येते. अल्प काळासाठी उपयोग करुन कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मॉयकानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली. मात्र बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. त्या अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत. मात्र खाद्य पदार्थांच्या पॅकिंगमध्ये येत असलेल्या प्लास्टिक पिशव्या मजबूत, टिकावू व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत खाद्यपदार्थ भरुन पॅकिंग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही. या खाद्य पदार्थांच्या पॉकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टिक पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या पिशव्या खावून मोठ्या संख्येने मरण पावल्या आहेत. तर काही प्लास्टिक पिशव्या सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे सांडपाण्याचा निचराही होत नाही.शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या हवाबंद प्लास्टिक पिशव्यांना यातून वगळण्याचे काय कारण असावे, हे संबंधित प्रशासनालाच माहीत? या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे गावचा चेहरा-मोहरा बदलत आहे. पूर्वी बऱ्याच वस्तूंची पॅकिंग टिकावू दर्जेदार प्लास्टिक पिशव्यात केली जात होती. मात्र बऱ्याच उत्पादकांनी पॅकिंगचे प्लास्टिक बदलून कागद मिश्रित प्लास्टिकच्या पॉकिटांचा उपयोग सुरू केला आहे. मात्र सध्या बाजारात व गावागावातील लहान मोठ्या दुकानदाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री जोमात होत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा श्वासच कोंडल्याचे दिसून येत आहे.