शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मागासक्षेत्र अनुदान निधी योजनेला घरघर

By admin | Updated: April 20, 2015 01:03 IST

मागास जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने सुरू केलेली मागासक्षेत्र अनुदान निधी योजना अखरेच्या घटका मोजत आहे.

संतोष बुकावन अर्जुनी मोरगावमागास जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने सुरू केलेली मागासक्षेत्र अनुदान निधी योजना अखरेच्या घटका मोजत आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात अर्जुनी-मोरगाव तालुक्याला एक कोटी ७० लाखांचे आर्थिक उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात एक छदामही निधी प्राप्त झाला नाही. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून या योजनेलाच तडे गेले आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी १९ कोटी ५९ लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र एकही राशी मिळाली नाही.विकासातील प्रादेशिक असमतोल व विषमता दूर करण्याकरिता केंद्र शासनाने देशातील २५० जिल्ह्यात २००६-०७ पासून मागासक्षेत्र अनुदान निधी ही योजना कार्यान्वित केली. यात महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नांदेड व औरंगाबाद या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत आवारभिंत, सिमेंट रस्ते, नाली, कोंडवाडा, समाजमंदिर, हातपंप, ग्रामपंचायत भवन, स्मशानघाट, शाळा खोली, अंगणवाडी, विंधनविहिर, किचनशेड, घरकुल, साठवण बंधारा, कृषी गोदाम, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बांधकाम केले जातात. ही योजना २००६ ते २०१४ या कार्यकाळात सुरळीत होती. यासाठी निधी पण प्राप्त होता, परंतु २०१४-१५ या आर्थिक वर्षात ६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी एक कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. मात्र शासनातर्फे अर्जुनी-मोरगाव तालुक्याला छदामही प्राप्त झाला नाही. गावाच्या विकासकामांसाठी या योजनेतून ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी थेट दिला जातो. प्रस्तावित काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्याबरोबर उर्वरित २० टक्के निधी देण्याची तरतूद आहे. मात्र या योजनेतून पूर्ण झालेल्या कामांचा २० टक्के निधी अद्यापही परत देण्यात आला नाही. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी बांधकामासाठी खरेदी केलेल्या साहित्यांची राशी तसेच मजुरांचा मेहनताना देणे बाकी आहे. या योजनेत आधी ग्रा.पं. खात्यात निधी जमा होतो. बांधकाम पूर्ण होईस्तोवर ही राशी बँक खात्यातच असते. या राशीवर बँकेकडून व्याज मिळतो. अशी व्याजाची राशी मात्र शासनाने ग्रामपंचायतकडून वसूल केली. विकास कामांसाठी अनुदान जमा होऊनही ज्या ग्रामपंचायतींनी ३१ मार्चपर्यंत विकास कामे केली नाहीत. हा निधी ग्रा.पं. खात्यात पडून आहे. अशा ग्रा.पं.च्या खात्यातून विकास कामे केलेल्या ग्रा.पं.चे २० टक्के अनुदान वळते करावे अशी अनेक ग्रा.पं.नी मागणी केली आहे.