शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

मागासक्षेत्र अनुदान निधी योजनेला घरघर

By admin | Updated: April 20, 2015 01:03 IST

मागास जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने सुरू केलेली मागासक्षेत्र अनुदान निधी योजना अखरेच्या घटका मोजत आहे.

संतोष बुकावन अर्जुनी मोरगावमागास जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने सुरू केलेली मागासक्षेत्र अनुदान निधी योजना अखरेच्या घटका मोजत आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात अर्जुनी-मोरगाव तालुक्याला एक कोटी ७० लाखांचे आर्थिक उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात एक छदामही निधी प्राप्त झाला नाही. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून या योजनेलाच तडे गेले आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी १९ कोटी ५९ लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र एकही राशी मिळाली नाही.विकासातील प्रादेशिक असमतोल व विषमता दूर करण्याकरिता केंद्र शासनाने देशातील २५० जिल्ह्यात २००६-०७ पासून मागासक्षेत्र अनुदान निधी ही योजना कार्यान्वित केली. यात महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नांदेड व औरंगाबाद या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत आवारभिंत, सिमेंट रस्ते, नाली, कोंडवाडा, समाजमंदिर, हातपंप, ग्रामपंचायत भवन, स्मशानघाट, शाळा खोली, अंगणवाडी, विंधनविहिर, किचनशेड, घरकुल, साठवण बंधारा, कृषी गोदाम, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बांधकाम केले जातात. ही योजना २००६ ते २०१४ या कार्यकाळात सुरळीत होती. यासाठी निधी पण प्राप्त होता, परंतु २०१४-१५ या आर्थिक वर्षात ६७ कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी एक कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. मात्र शासनातर्फे अर्जुनी-मोरगाव तालुक्याला छदामही प्राप्त झाला नाही. गावाच्या विकासकामांसाठी या योजनेतून ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी थेट दिला जातो. प्रस्तावित काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्याबरोबर उर्वरित २० टक्के निधी देण्याची तरतूद आहे. मात्र या योजनेतून पूर्ण झालेल्या कामांचा २० टक्के निधी अद्यापही परत देण्यात आला नाही. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी बांधकामासाठी खरेदी केलेल्या साहित्यांची राशी तसेच मजुरांचा मेहनताना देणे बाकी आहे. या योजनेत आधी ग्रा.पं. खात्यात निधी जमा होतो. बांधकाम पूर्ण होईस्तोवर ही राशी बँक खात्यातच असते. या राशीवर बँकेकडून व्याज मिळतो. अशी व्याजाची राशी मात्र शासनाने ग्रामपंचायतकडून वसूल केली. विकास कामांसाठी अनुदान जमा होऊनही ज्या ग्रामपंचायतींनी ३१ मार्चपर्यंत विकास कामे केली नाहीत. हा निधी ग्रा.पं. खात्यात पडून आहे. अशा ग्रा.पं.च्या खात्यातून विकास कामे केलेल्या ग्रा.पं.चे २० टक्के अनुदान वळते करावे अशी अनेक ग्रा.पं.नी मागणी केली आहे.