शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आयुर्वेदिक दवाखाना डॉक्टरविना झाला पोरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

४ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोंडगावदेवी गावात आज घडीला आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. लाखो रुपये वेळोवेळी खर्चून सुसज्ज केलेली दवाखान्याची ईमारत डॉक्टर व कर्मचाऱ्यांविना पोरकी होऊन कुलूपबंद अस्थेत आहे.काही वर्षापूर्वी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी तब्बल १२ वर्षापासून सेवा दिली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : गावकरी आरोग्य सेवेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे. कोणताही नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही. समस्त जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन स्तरावरुन विविध योजना राबवित येत आहे. मात्र दुसरीकडे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा मनुष्यबळाअभावी कुचकामी ठरत आहे.येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्यात मागील काही वर्षांपासून डॉक्टर व परिचर कायमस्वरुपी नसल्याने सध्या दवाखाना कुलूपबंद आहे. परिसरातील सामान्य जनता आरोग्य सेवेपासून वंचित राहत आहे. कर्मचारी भटकत नसल्याने हा दवाखाना डॉक्टरविना ‘पोरका’ झाल्याचे चित्र आहे.स्थानिक व परिसरातील विहिरगाव, देऊळगाव, बोदरा इत्यादी गावांसाठी येथील आयुर्वेदिक दवाखाना सोयीस्कर होता. यापूर्वी सदर दवाखान्यात प्रशिक्षित डॉक्टरांची नियुक्ती होत असल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला नि:शुल्क आरोग्य सेवेचा लाभ मिळणे सहज शक्य होते. दवाखान्यात बºयाचपैकी बाह्यरुग्णांची नोंद होत होती.४ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोंडगावदेवी गावात आज घडीला आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. लाखो रुपये वेळोवेळी खर्चून सुसज्ज केलेली दवाखान्याची ईमारत डॉक्टर व कर्मचाऱ्यांविना पोरकी होऊन कुलूपबंद अस्थेत आहे.काही वर्षापूर्वी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी तब्बल १२ वर्षापासून सेवा दिली.या दवाखान्यात नियुक्त असलेले डॉ.कुलसुंगे मागील ४ वर्षापासून चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार सांभाळण्यासाठी त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून येथील जि.प.आयुर्वेदिक दवाखान्याला अवकळा आली. बºयाच कालावधीनंतर डॉ. मेघना मांढरे या २२ जुलै २०१९ रोजी रुजू झाल्या. परंतु त्यांचा मन ईथे रमले नाही. अखेर २६ आॅगस्ट २०१९ रोजी त्यांनी आपल्या सोयीनुसार बदली करुन घेतली. तेव्हापासून या दवाखान्यावर अवकाळा आली आहे.लोकप्रतिनिधी उदासीनयेथील जि.प.आयुर्वेदिक दवाखान्यात प्रशिक्षीत तज्ज्ञ अशा वैद्यकीय अधिकाºयाची व आवश्यक कर्मचाºयांची उणीव दूर करुन डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडत आहे. सामान्य जनतेला नित्यनेम आवश्यक असलेली आरोग्य सेवा पूर्ण:त रखडली आहे. परिणामी परिसरातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.डॉक्टरांची नियुक्ती करास्थानिक जि.प.आयुर्वेदिक दवाखान्यात रिक्त असलेले वैद्यकीय अधिकाºयांचे पद विनाविलंब भरुन ग्रामस्थांनी आरोग्य सेवेचा लाभ द्या असा ठराव ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे यांनी मासीक सभेत मांडून समंत केला. ठरावाच्या अनुषंगाने संबंधीतांकडे पाठपुरावा करण्यात यावा असा मुद्दा उचलून धरण्यात आला. स्थानिक व परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेचा विचार करता आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरांची विनानिलंब नियुक्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक