शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

खर्च टाळा; दुष्काळग्रस्तांना मदत करा

By admin | Updated: September 20, 2015 02:11 IST

गणेशोत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी त्यामागे सामाजिक परंपराही आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकाना जागृत करण्याचे काम ...

‘लोकमत’च्या सर्वेक्षणातील सूर : ९५ टक्के नागरिकांना वाटते सामाजिक भान जपावेनरेश रहिले  गोंदियागणेशोत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी त्यामागे सामाजिक परंपराही आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकाना जागृत करण्याचे काम याच गणेशोत्सवाच्या माध्यमातून झाले. मग आताही हा उत्सव साजरा करताना सामाजिक भान राखण्यात गैर काय? याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गोंदिया शहरात सहा प्रश्नांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. त्यात प्रत्येक मंडळाने सामाजिक भान राखलेच पाहीजे, अशी भावना व्यक्त करतानाच मंडळांकडून होणारा अनावश्यक खर्च, ध्वनीप्रदूषण याला आळा घालावा, असे मत व्यक्त केले.एकीडकडे गणेशोत्सव सुरू झाला तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. जिल्ह्यातही यावर्षी शेतकऱ्यांची स्थिती पाहीजे तशी चांगली नाही. शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी उत्सवावर आवश्यक असलेला खर्च जरूर करावा, पण टाळता येण्यासारखा, अनावश्यक खर्च न करता त्यातून वाचणारे पैसे दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करून द्यावेत, आणि समाजापुढे आदर्श स्थापित करावा, असा सूर लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून उमटला.गणेशोत्सवात मंडप डेकोरेशन, लायटिंग, मिरवणुकीसाठी डिजे, गुलाल अशा अनेक बाबींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. वास्तविक यातील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे वाटते का? या प्रश्नाला ९५ टक्के लोकांनी होकार दिला आहे. पाच टक्के लोकांनी काही प्रमाणात असे उत्तर दिले. गणेशोत्सवासाठी जबरीने वर्गणी गोळा करणे योग्य आहे का, या प्रश्नाला ८२ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. काही प्रमाणात म्हणणारे १८ टक्के आहेत. म्हणजेच जबरीच्या वर्गणीला नागरिकांचे समर्थन नाही हे दिसून येते.गणेशोत्सावादरम्यान १० दिवस विविध मंडळांकडून कोणत्या पध्दतीचे कार्यक्रम व्हावेत या प्रश्नावर ६५ टक्के लोकांनी धार्मिक कार्यक्रमाला पसंती दिली. २९ टक्के लोकांनी सामाजिक कार्यक्रम तर केवळ ६ टक्के लोकांनी मजोरंजनात्मक कार्यक्रम व्हावेत, असे मत व्यक्त केले. मंडप, लायटींग व मिरवणुकांवर होणाऱ्या वारेमाप खर्चाचे समर्थन करता का? या प्रश्नाला १५ टक्के लोकांनी समर्थन दिले. मात्र तब्बल ५० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. काही प्रमाणात कराणारे समर्थन देणारे ३५ टक्के लोक आहेत. विर्सजनादरम्यान डिजे वाजविताना होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण असावे, असे वाटते का याला ८६ टक्के लोकांनी होकार दिला. तर १४ टक्के लोकांनी काही प्रमाणात डिजेचे समर्थन केले. मात्र पूर्णपणे डिजेच्या ध्वनीप्रदुषणाला कोणीही समर्थन दिले नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सिनेमाची गाणी वाजवून नृत्य केले जाते, त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य लोप पावते का, या प्रश्नाला ४१ टक्के लोकांनी होकार दिला. २८ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले तर ३१ टक्के लोकांनी काही प्रमाणात असे उत्तर आहे. यावरून बहुतांश लोकांना विसर्जन मिरवणुकीतील सिनेमाची गाणी आणि त्याच्या तालावर चालणारा धांगडधिंगा नको आहे.गोंदियावासीयांच्या या भावनांचा जिल्ह्यातील समस्त गणेश मंडळं विचार करतील आणि त्यानुसार अपेक्षित बदल करतील का? हे लवकरच दिसून येईल.