शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

खर्च टाळा; दुष्काळग्रस्तांना मदत करा

By admin | Updated: September 20, 2015 02:11 IST

गणेशोत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी त्यामागे सामाजिक परंपराही आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकाना जागृत करण्याचे काम ...

‘लोकमत’च्या सर्वेक्षणातील सूर : ९५ टक्के नागरिकांना वाटते सामाजिक भान जपावेनरेश रहिले  गोंदियागणेशोत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी त्यामागे सामाजिक परंपराही आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकाना जागृत करण्याचे काम याच गणेशोत्सवाच्या माध्यमातून झाले. मग आताही हा उत्सव साजरा करताना सामाजिक भान राखण्यात गैर काय? याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गोंदिया शहरात सहा प्रश्नांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. त्यात प्रत्येक मंडळाने सामाजिक भान राखलेच पाहीजे, अशी भावना व्यक्त करतानाच मंडळांकडून होणारा अनावश्यक खर्च, ध्वनीप्रदूषण याला आळा घालावा, असे मत व्यक्त केले.एकीडकडे गणेशोत्सव सुरू झाला तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. जिल्ह्यातही यावर्षी शेतकऱ्यांची स्थिती पाहीजे तशी चांगली नाही. शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी उत्सवावर आवश्यक असलेला खर्च जरूर करावा, पण टाळता येण्यासारखा, अनावश्यक खर्च न करता त्यातून वाचणारे पैसे दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करून द्यावेत, आणि समाजापुढे आदर्श स्थापित करावा, असा सूर लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून उमटला.गणेशोत्सवात मंडप डेकोरेशन, लायटिंग, मिरवणुकीसाठी डिजे, गुलाल अशा अनेक बाबींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. वास्तविक यातील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे वाटते का? या प्रश्नाला ९५ टक्के लोकांनी होकार दिला आहे. पाच टक्के लोकांनी काही प्रमाणात असे उत्तर दिले. गणेशोत्सवासाठी जबरीने वर्गणी गोळा करणे योग्य आहे का, या प्रश्नाला ८२ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. काही प्रमाणात म्हणणारे १८ टक्के आहेत. म्हणजेच जबरीच्या वर्गणीला नागरिकांचे समर्थन नाही हे दिसून येते.गणेशोत्सावादरम्यान १० दिवस विविध मंडळांकडून कोणत्या पध्दतीचे कार्यक्रम व्हावेत या प्रश्नावर ६५ टक्के लोकांनी धार्मिक कार्यक्रमाला पसंती दिली. २९ टक्के लोकांनी सामाजिक कार्यक्रम तर केवळ ६ टक्के लोकांनी मजोरंजनात्मक कार्यक्रम व्हावेत, असे मत व्यक्त केले. मंडप, लायटींग व मिरवणुकांवर होणाऱ्या वारेमाप खर्चाचे समर्थन करता का? या प्रश्नाला १५ टक्के लोकांनी समर्थन दिले. मात्र तब्बल ५० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. काही प्रमाणात कराणारे समर्थन देणारे ३५ टक्के लोक आहेत. विर्सजनादरम्यान डिजे वाजविताना होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण असावे, असे वाटते का याला ८६ टक्के लोकांनी होकार दिला. तर १४ टक्के लोकांनी काही प्रमाणात डिजेचे समर्थन केले. मात्र पूर्णपणे डिजेच्या ध्वनीप्रदुषणाला कोणीही समर्थन दिले नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सिनेमाची गाणी वाजवून नृत्य केले जाते, त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य लोप पावते का, या प्रश्नाला ४१ टक्के लोकांनी होकार दिला. २८ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले तर ३१ टक्के लोकांनी काही प्रमाणात असे उत्तर आहे. यावरून बहुतांश लोकांना विसर्जन मिरवणुकीतील सिनेमाची गाणी आणि त्याच्या तालावर चालणारा धांगडधिंगा नको आहे.गोंदियावासीयांच्या या भावनांचा जिल्ह्यातील समस्त गणेश मंडळं विचार करतील आणि त्यानुसार अपेक्षित बदल करतील का? हे लवकरच दिसून येईल.