शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

बँकाकडून कर्जमाफीची माहिती लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:49 IST

चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

ठळक मुद्देजिल्ह्यात पात्र शेतकरी किती : अधिकारीच अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शुक्रवारी (दि.२७) दुसºया दिवशीही जिल्ह्यातील किती शेतकºयांच्या बँका खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. याची माहिती बँकाकडेच उपलब्ध नव्हती. शिवाय ही माहिती लपविण्याचा प्रयत्न बँकाकडून केला जात आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ६९ हजार शेतकरी पात्र ठरले. तर ९५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. बँका आणि सहकार उपनिंबधक कार्यालयाने अर्जांची छाननी व चावडी वाचन करुन यापैकी जेवढ्या शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले. त्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६) पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार होती. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर नेमके किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, किती शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.यासंदर्भातील माहिती जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात सध्या कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. माहिती देण्यासंदर्भात वरिष्ठांकडून निर्देश नसल्याचे सांगितले.एकंदरीत बँकाकडून कर्जमाफीची माहिती देण्यास टाळटाळ करुन माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही बँकाचे अधिकारीच कजमाफीच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध शंकाना पेव फुटले आहे.विभागणीनंतरही समस्यासहकार उपनिंबंधक कार्यालयाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या अर्जांची छाननी करुन त्या अर्जांची ग्रीन, येलो, रेड अशा तीन रंगात विभागणी केली. ग्रीन यादीतील अर्ज पात्र, रेड यादीतील अर्ज अपात्र आणि येलो रंगाच्या यादीतील अर्जांमध्ये त्रृट्या असल्याची विभागनी केली होती. मात्र यानंतरही शेतकºयांनी केलेल्या आॅनलाईन अर्जाचे आधार क्रमांक एकसारखे व काही अर्जांमध्ये बºयाच त्रृट्या असल्याची माहिती आहे. अर्जांची छाननी करणाºया आयटी विभागाच्या कर्मचाºयांसमोर सुध्दा अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे.शेतकरी वाºयावरशासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र आता कर्जमाफीची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक किचकट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा बँका आणि तहसीलकार्यालयाच्या चकरा मारुन हैराण झाले आहे. शेतकºयांना बँकाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने ते देखील वाºयावर असल्याचे चित्र आहे.