शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बँकाकडून कर्जमाफीची माहिती लपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:49 IST

चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

ठळक मुद्देजिल्ह्यात पात्र शेतकरी किती : अधिकारीच अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चावडी वाचनानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६)पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शुक्रवारी (दि.२७) दुसºया दिवशीही जिल्ह्यातील किती शेतकºयांच्या बँका खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. याची माहिती बँकाकडेच उपलब्ध नव्हती. शिवाय ही माहिती लपविण्याचा प्रयत्न बँकाकडून केला जात आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील ६९ हजार शेतकरी पात्र ठरले. तर ९५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. बँका आणि सहकार उपनिंबधक कार्यालयाने अर्जांची छाननी व चावडी वाचन करुन यापैकी जेवढ्या शेतकºयांचे अर्ज पात्र ठरले. त्या शेतकºयांच्या बँक खात्यात गुरूवार (दि.२६) पासून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार होती. चावडी वाचन आणि अर्जांच्या पडताळणीनंतर नेमके किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, किती शेतकºयांच्या खात्यात दोन दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.यासंदर्भातील माहिती जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात सध्या कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. माहिती देण्यासंदर्भात वरिष्ठांकडून निर्देश नसल्याचे सांगितले.एकंदरीत बँकाकडून कर्जमाफीची माहिती देण्यास टाळटाळ करुन माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही बँकाचे अधिकारीच कजमाफीच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध शंकाना पेव फुटले आहे.विभागणीनंतरही समस्यासहकार उपनिंबंधक कार्यालयाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या अर्जांची छाननी करुन त्या अर्जांची ग्रीन, येलो, रेड अशा तीन रंगात विभागणी केली. ग्रीन यादीतील अर्ज पात्र, रेड यादीतील अर्ज अपात्र आणि येलो रंगाच्या यादीतील अर्जांमध्ये त्रृट्या असल्याची विभागनी केली होती. मात्र यानंतरही शेतकºयांनी केलेल्या आॅनलाईन अर्जाचे आधार क्रमांक एकसारखे व काही अर्जांमध्ये बºयाच त्रृट्या असल्याची माहिती आहे. अर्जांची छाननी करणाºया आयटी विभागाच्या कर्मचाºयांसमोर सुध्दा अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे.शेतकरी वाºयावरशासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र आता कर्जमाफीची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक किचकट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा बँका आणि तहसीलकार्यालयाच्या चकरा मारुन हैराण झाले आहे. शेतकºयांना बँकाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने ते देखील वाºयावर असल्याचे चित्र आहे.