शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

२० हजार घरकुलांना मंजुरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:49 IST

तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेवून तालुक्यात २० हजार घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात यावा. शौचालयाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांची थकीत देयके त्वरीत देण्यात यावी. तसेच रोजगार सेवकांचे मागील दीड वर्षांपासून थकीत असलेले मानधन त्वरीत देण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी व तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली.

ठळक मुद्देरोजगार सेवकांचे थकीत मानधन काढा : तालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेवून तालुक्यात २० हजार घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात यावा. शौचालयाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांची थकीत देयके त्वरीत देण्यात यावी. तसेच रोजगार सेवकांचे मागील दीड वर्षांपासून थकीत असलेले मानधन त्वरीत देण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी व तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली.मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनातून शासनातर्फे रमाई आवास, पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०११ मध्ये गोंदिया तालुक्यातील २७ हजार लाभार्थी घरकुल योजनेस पात्र ठरले होते. मात्र आतापर्यंत केवळ ६ ते ७ हजार घरकुलाचे वाटप करण्यात आले आहे. मागील सात आठ वर्षांपासून २० हजार घरकुल लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ज्यांचे घरकुल मंजूर करण्यात आले त्यांना अद्यापही बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. काही लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामासाठी पहिला २० हजार रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर बांधकामाला सुरूवात केली. मात्र यानंतर त्यांना उर्वरित पैसे न मिळाल्याने त्यांना सावकारांकडून कर्ज काढून बांधकाम करावे लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत देयकाची रक्कम त्वरीत देण्यात व २० हजार घरकुल बांधकामाला मंजुरी देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. शासनाच्या योजनेतंर्गत शौचालय बांधकामासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम करुन सुध्दा त्यांना मागील दीड वर्षांपासून त्याची देयके देण्यात आली नाही. त्यामुळे हे लाभार्थी पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहे. त्यांची अडचण लक्षात घेवून त्यांना त्वरीत देयके देण्यात यावी. रोजगार हमी योजनेवर कार्यरत रोजगार सेवकांना मागील दीड वर्षांपासून अद्यापही मानधन आणि प्रवास भत्त्याची रक्कम देण्यात आली नाही. परिणामी रोजगार सेवकांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याची बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेत बलकवडे यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी कोरडे यांना बोलावून रोजगार सेवकांचे थकीत मानधन त्वरीत काढण्याचे निर्देश दिले. तसेच उर्वरित मागण्यांवर सुध्दा लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, सुरजलाल महारवाडे, विठोबा लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, इंद्रायणी धावाडे, योगराज उपराडे, स्रेहा गौतम, प्रकाश डहाट, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, ओमप्रकाश भक्तवर्ती, निता पटले, विनिता टेंभरे प्रमिला करचाल, गुड्डू ठाकूर उपस्थित होते.