शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

झाडीपट्टीच्या कलाकारांना राजाश्रय द्या

By admin | Updated: March 27, 2016 01:50 IST

नाटकासाठी आयुष्य झिजवून समाजाला मनोरंजनातून जनजागृती देणाऱ्या कलावंतांची आज ससेहोलपट होत आहे.

रंगभूमी दिन विशेष : जिल्ह्यातील नाट्यकलावंतांची शासनाकडून अपेक्षानरेश रहिले गोंदिया‘कलाकारांना श्राप आहे की वरदान आहे, रंगभुमीवर त्याला मान आहे,तरी समाजाच्या नजरेत तो बदनाम आहे’हे शब्द झाडीपट्टीतील कलावंत, नाटककार, कलाकार, निर्माता व दिग्दर्शक शेखर पटले यांचे आहे. नाटकासाठी आयुष्य झिजवून समाजाला मनोरंजनातून जनजागृती देणाऱ्या कलावंतांची आज ससेहोलपट होत आहे. मुख्यमंत्री पूर्व विदर्भातील असले तरी त्यांचे झाडीतील कलेकडे दुर्लक्ष आहे. त्यांनी झाडीपट्टीतील कलावंतांच्या उत्थानासाठी या रंगभूमीला राजाश्रय द्यावा, असा सूर शेखर पटले या सुप्रसिद्ध नाट्यकलावंताने व्यक्त केला.जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने शेखर पटले यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांनी झाडीपट्टीतील कलावंतांची अवस्था किती विदारक आहे याचे चित्र मांडले. कलावंत नाटकात सहा महिने सेवा देताना आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो. त्याच्या परिवारावर उपाशी मरण्याची पाळी येऊ नये म्हणून आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांना खेचून आणून त्या मिळकतीवर उदरनिर्वाह करतो. परंतु त्या खऱ्या कलावंताकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अत्यंत वाईट आहे. आज अभिनयालाही व्यावसायिक स्वरुप आले, असे अनेकांचे म्हणणे आहे हे चुकीचे असल्याचे पटले सांगतात. अभिनय करताना कलावंतांनी आपल्या मुलांना माती चारायची का? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी कलावंतांनी आपल्या कामाचा मोबदला म्हणून दोन पैसे का घ्यायचे नाहीत? समाजात शिक्षक व इतर घटकही सेवा करताना पैसे घेतात. मग त्यांच्यावर व्यवसाय करीत असल्याचा आरोप का केला जात नाही. ज्यांनी रंगभूमीवर काम केले परंतु प्रेक्षक ज्यांना पसंत करीत नाहीत, असेच असंतुष्ट लोक रंगभुमीतून समाज प्रबोधन कमी आणि मनोरंजन जास्त वाढल्याचा आरोप करतात. परंतु समाजात प्रबोधनाची कामे करणारी मंडळे व्यासायिक नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.संपूर्ण रात्र अभिनय करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना फक्त एका व्यक्तीकडून ५० रुपये मिळतात. ज्यातून त्याच्या कुटुंबाचे तो पोट भरतो. त्या पैशात काही असंतुष्ट लोकांना व्यवसाय दिसत असेल तर २०० रुपयांची दारु पिऊन जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांनी कलावंतांवर टिका करणे चुकीचे आहे. कलावंतांनाही पोट आहे. ‘पेट में अनाज रहेंगा तो गाने का नाज रहेंगा,’ असे सांगत आज प्रत्येक क्षेत्र व्यापारी झालेले आहेत. शाळांचा व्यापार मांडला. परंतु नाटकातून कमावलेल्या पैशातून दोन वेळच्या जेवनाची सोय करण्याची तत्परता दाखविणाऱ्या कलावंतांनी आज उपाशी राहूनच काम करावे का? अनेकदा नाटकाच्या उद्घाटनाला लोकप्रतिनिधी येतात. भाषण करताना नाटकावर टिका करतात. परंतु ते लोकप्रतिनिधी अशाच नाटकातून प्रसिद्धी मिळवून मोठे राजकारणी म्हणून स्वत:ला मिरवितात. त्यांनी मुळ परिस्थितीला विसरू नये, असाही सल्ला शेखर पटले यांनी दिला. या झाडीपट्टीतील अनेक कलावंत महाराष्ट्रात गाजले. त्यात शेखर पटले, चंद्रपृूरचे शेखर डोंगरे, चिचडगचे ज्ञानेश्वर कापगते, चंद्रपूर जिल्ह्यातील कमलाकर बोरकर, मालडोंगरी येथील हिरालाल पेंटर, भंडारा येथील आत्माराम खोब्रागडे यांचा समावेश आहे. परंतू दिवसेंदिवस झाडीपट्टीचे ‘अच्छे दिन’ लोप पावण्याची शक्यता आहे.नाट्यकलावंतांना चित्रपटाची संधीशेखर पटले यांनी झाडीपट्टीचा कलावंत म्हणून काम करताना ३ हजार नाट्यप्रयोग सादर केले. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ व पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली, सातारा येथे त्यांनी झाडीपट्टीचा नावलौकिक वाढविला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी झाडीचे नाटक नेण्याचे धाडस दाखविले. झाडीतील कलावंताची सिनेसृष्टीतील लोकांशी ओळख व्हावी यासाठी त्यांनी २०१३ मध्ये ‘लाल चुडा’ नावाचा चित्रपट काढला. या चित्रपटात ५० झाडीपट्टीतील कलावंतांना संधी देण्यात आली. झाडीपट्टी नाट्य अवार्ड महोत्सवझाडीपट्टीतील कलावंतामध्ये सुप्त गुण आहेत. परंतु त्यांचा सत्कार झाला नाही. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी दसऱ्यापर्यंत झाडीपट्टी नाट्य अवार्ड महोत्सव आयोजित करुन गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या चार जिल्ह्यातील कलावंतांचा सत्कार करु. यासाठी मुख्यमंत्री, वित्तमंत्री, सांस्कृतिक मंत्री व मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्यांना बोलावणार असल्याचे शेखर पटले म्हणाले. तीन हजारांवर नाट्यकलावंतांची उपेक्षागोंदिया जिल्ह्यासह झाडीपट्टीतील तमाम राजकारण्यांवर रोष दाखवित झाडीपट्टीत ३ हजारांपेक्षा अधिक कलावंत आहेत. झाडीपट्टीतील कलावंतांचे उत्थान व्हावे यासाठी आमदारांनी प्रश्नच उपस्थित केला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष याकडे वेधल्या गेले नाही. सध्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. झाडीपट्टी म्हणून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथील मूळ रहिवासी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून येथील कलाकारांची कदर होईल अशी अपेक्षा आहे. झाडीपट्टीतील दिवंगत कलाकारांच्या कुटुंबियांना मदत द्यावी, वृद्ध कलाकार व सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कलाकारांना राज्य शासनाचे राजाश्रय द्यावा, अशी मागणी शेखर पटले यांनी केली आहे.