शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मत्स संवर्धनाचा कार्यक्रम राबवा

By admin | Updated: February 10, 2016 02:19 IST

पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणात आहेत.

वित्त व नियोजनमंत्री मुनगंटीवार : माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरणगोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात सिंचनाची क्षमता आहे. या तलावांच्या खोलीकरणाची कामे प्रभावीपणे करून मत्स्य संवर्धनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.सोमवारी (दि.८) विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, पालक सचित पी.एस. मीना, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीची कामे करण्यासाठी यांत्रिकी विभागाची मदत घ्यावी. त्यामुळे खर्च कमी येईल. विविध यंत्रणा व लोकसहभागातून तलावांच्या दुरूस्तीची व जलयुक्त शिवार अभियानाची कामे करावी. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती जास्तीत जास्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धन व उत्पादन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचा दौरा करावा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.जिल्ह्यातील तलावांवर अतिक्रमण होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, अशा तलावांतून जास्तीत जास्त सिंचन क्षमता निर्माण होईल, याचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील १० पर्यटन स्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व वन पर्यटनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा.१०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या तलावांच्या खोलीकरणाचे काम चांगले झाले असून त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या एक हजार ७०० तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन करून तलाव खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात यावा. त्यामधून मत्स्य संवर्धं मोठ्या प्रमाणात करता येईल, असे त्यांनी सांगितले. पाणी पुरवठा व स्वच्छता, ग्राम विकास, रस्ते विकास, लघू पाटबंधारे यासाठी अधिक निधी देण्यात यावे, अशी अपेक्षासुद्धा पालकमंत्री बडोले यांनी व्यक्त केली.आ. अग्रवाल यांनी माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी, दिवाबत्तीच्या विद्युत खांबासाठी, वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा. तसेच निधीमध्ये कपात करण्यात येवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१४-१५ मध्ये ८५ कोटी रूपये अर्थसंकल्पीत असता ८४ कोटी ९३ लाख रूपये खर्च करण्यात आले तर सन २०१५-१६ च्या योजनेत ११४ कोटी ९२ लाख अर्थसंकल्पीत असता जानेवारी २०१६ अखेर ३२ कोटी ३७ लाख रूपये खर्च करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला असून ८६ कोटी ५७ लाख रूपये शासनाने ठरवून दिलेलेली आर्थिक मर्यादा असून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १९९ कोटींची मागणी केली आहे. यामध्ये अतिरिक्त मागणी ११२ कोटी ४३ लाख रूपयांची आहे.सदर बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)