शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कुणाला कामाची लगबग तर कुणाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 13, 2017 00:59 IST

दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो.

चाहुल खरीप हंगामाची : कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यालोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो. शेणखात शेतावर नेवून टाकणे, बियाण्यांची देवाण-घेवाण करणे, जमिनीची सफाई, मशागत करणे इत्यादी कामे करीत असते. त्याबरोबर शेतीची अवजारे नांगर, वखर, बैलबंडी, दुरुस्ती करणे किंवा नवीन बनविण्याचे काम करतो व शेतीच्या कामाला लागतो. मृग नक्षत्र लागताच पेरणीला सुरुवात करतो. ज्या शेतकऱ्यांची शेती आधीपासून नागरणी केलेली असते, ते शेतकरी पेरणीला आधीपासून सुरुवात करतात. मात्र ज्यांचे शेत नागरणी केलेले नसते त्याला दमदार पावसाची वाट बघावी लागते. परंतु यावर्षी उन्हाळी धानपीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नियोजन बदल होत आहे. मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून काही शेतकरी धानपेरणीच्या तयारीला लागले आहेत. तर काही शेतकरी पावसाची वाट बघू लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक टाकले होते, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांची कापणीसुद्धा बाकी आहे. त्यामुळे ते उन्हाळी धान पिकाची कापणी, मळणी व तणस व्यवस्थित करण्याच्या लगबगीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी स्वत: बोअरवेलच्या पाण्याचे उन्हाळी धानपीक लावले होते, त्यांची कामे आटोपली आहेत आणि ते पुढील खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. परंतु जे शेतकरी जलाशयाच्या पाण्याच्या भरवशावर धानपीक लावण्यासाठी अवलंबून होते, त्या शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. उन्हाळी धानपिकाचे काम लांबणीवर जाण्यामागे दुसरे कारण असे की, काही वर्षापूर्वी रबी पिकात तीन महिन्यांच्या कालावधीचे धानाचे वाण लावत होते. यात सी.आर.सव्वीस, कलिंगा यासारख्या वाणाच्या धानाचा समावेश होता. परंतु आता एम.टी.यु., एक हजार दहा सारखे १२० दिवसांच्या कालावधीचे वाणाचे धान लावले जातात. त्यामुळे मे महिन्यात होणारी कापणी जून महिन्यापर्यंत लांबते. यात एकीकडे रबी हंगामातील उन्हाळी धानपिकाची कामे आटोपण्याची लगबग तर दुसरीकडे खरीप हंगामाची कामे करण्याची घाई, यात शेतकरी गोंधळून जातात. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले नाही, त्यांची खरीप हंगामाच्या कामाबाबत आघाडी असते. अशा परिस्थितीत रोवणीचे कामसुद्धा मागे पुढे असतात. काही पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी लावल्याने खरीप हंगामातील पीक कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. ही तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना म्हणून ज्यावर्षी उन्हाळी धानपीक घेण्यात येते, त्यावर्षी जलाशयातील पाणी शेतकऱ्यांना एक महिन्यापूर्वी सामान्यत: डिसेंबर महिन्यात पुरविले पाहिजे. तसेच कृषी विभागाने ९० ते १०० दिवसांच्या कालावधीच्या धानाची वाण विकसीत केले पाहिजे, अशी मागणी होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून धानाची वाण तयार केल्यास शेतीचे काम यशस्वीपणे होवू शकतात.