शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला कामाची लगबग तर कुणाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 13, 2017 00:59 IST

दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो.

चाहुल खरीप हंगामाची : कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यालोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो. शेणखात शेतावर नेवून टाकणे, बियाण्यांची देवाण-घेवाण करणे, जमिनीची सफाई, मशागत करणे इत्यादी कामे करीत असते. त्याबरोबर शेतीची अवजारे नांगर, वखर, बैलबंडी, दुरुस्ती करणे किंवा नवीन बनविण्याचे काम करतो व शेतीच्या कामाला लागतो. मृग नक्षत्र लागताच पेरणीला सुरुवात करतो. ज्या शेतकऱ्यांची शेती आधीपासून नागरणी केलेली असते, ते शेतकरी पेरणीला आधीपासून सुरुवात करतात. मात्र ज्यांचे शेत नागरणी केलेले नसते त्याला दमदार पावसाची वाट बघावी लागते. परंतु यावर्षी उन्हाळी धानपीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नियोजन बदल होत आहे. मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून काही शेतकरी धानपेरणीच्या तयारीला लागले आहेत. तर काही शेतकरी पावसाची वाट बघू लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक टाकले होते, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांची कापणीसुद्धा बाकी आहे. त्यामुळे ते उन्हाळी धान पिकाची कापणी, मळणी व तणस व्यवस्थित करण्याच्या लगबगीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी स्वत: बोअरवेलच्या पाण्याचे उन्हाळी धानपीक लावले होते, त्यांची कामे आटोपली आहेत आणि ते पुढील खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. परंतु जे शेतकरी जलाशयाच्या पाण्याच्या भरवशावर धानपीक लावण्यासाठी अवलंबून होते, त्या शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. उन्हाळी धानपिकाचे काम लांबणीवर जाण्यामागे दुसरे कारण असे की, काही वर्षापूर्वी रबी पिकात तीन महिन्यांच्या कालावधीचे धानाचे वाण लावत होते. यात सी.आर.सव्वीस, कलिंगा यासारख्या वाणाच्या धानाचा समावेश होता. परंतु आता एम.टी.यु., एक हजार दहा सारखे १२० दिवसांच्या कालावधीचे वाणाचे धान लावले जातात. त्यामुळे मे महिन्यात होणारी कापणी जून महिन्यापर्यंत लांबते. यात एकीकडे रबी हंगामातील उन्हाळी धानपिकाची कामे आटोपण्याची लगबग तर दुसरीकडे खरीप हंगामाची कामे करण्याची घाई, यात शेतकरी गोंधळून जातात. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले नाही, त्यांची खरीप हंगामाच्या कामाबाबत आघाडी असते. अशा परिस्थितीत रोवणीचे कामसुद्धा मागे पुढे असतात. काही पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी लावल्याने खरीप हंगामातील पीक कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. ही तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना म्हणून ज्यावर्षी उन्हाळी धानपीक घेण्यात येते, त्यावर्षी जलाशयातील पाणी शेतकऱ्यांना एक महिन्यापूर्वी सामान्यत: डिसेंबर महिन्यात पुरविले पाहिजे. तसेच कृषी विभागाने ९० ते १०० दिवसांच्या कालावधीच्या धानाची वाण विकसीत केले पाहिजे, अशी मागणी होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून धानाची वाण तयार केल्यास शेतीचे काम यशस्वीपणे होवू शकतात.