शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कुणाला कामाची लगबग तर कुणाला पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 13, 2017 00:59 IST

दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो.

चाहुल खरीप हंगामाची : कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यालोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दरवर्षी अक्षय तृतीयानंतर खरीप हंगामाची चाहूल लागत असते. शेतकरी आपली पेरणी पूर्वीची काम करणे सुरू करतो. शेणखात शेतावर नेवून टाकणे, बियाण्यांची देवाण-घेवाण करणे, जमिनीची सफाई, मशागत करणे इत्यादी कामे करीत असते. त्याबरोबर शेतीची अवजारे नांगर, वखर, बैलबंडी, दुरुस्ती करणे किंवा नवीन बनविण्याचे काम करतो व शेतीच्या कामाला लागतो. मृग नक्षत्र लागताच पेरणीला सुरुवात करतो. ज्या शेतकऱ्यांची शेती आधीपासून नागरणी केलेली असते, ते शेतकरी पेरणीला आधीपासून सुरुवात करतात. मात्र ज्यांचे शेत नागरणी केलेले नसते त्याला दमदार पावसाची वाट बघावी लागते. परंतु यावर्षी उन्हाळी धानपीक असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नियोजन बदल होत आहे. मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून काही शेतकरी धानपेरणीच्या तयारीला लागले आहेत. तर काही शेतकरी पावसाची वाट बघू लागले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक टाकले होते, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांची कापणीसुद्धा बाकी आहे. त्यामुळे ते उन्हाळी धान पिकाची कापणी, मळणी व तणस व्यवस्थित करण्याच्या लगबगीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी स्वत: बोअरवेलच्या पाण्याचे उन्हाळी धानपीक लावले होते, त्यांची कामे आटोपली आहेत आणि ते पुढील खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. परंतु जे शेतकरी जलाशयाच्या पाण्याच्या भरवशावर धानपीक लावण्यासाठी अवलंबून होते, त्या शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. उन्हाळी धानपिकाचे काम लांबणीवर जाण्यामागे दुसरे कारण असे की, काही वर्षापूर्वी रबी पिकात तीन महिन्यांच्या कालावधीचे धानाचे वाण लावत होते. यात सी.आर.सव्वीस, कलिंगा यासारख्या वाणाच्या धानाचा समावेश होता. परंतु आता एम.टी.यु., एक हजार दहा सारखे १२० दिवसांच्या कालावधीचे वाणाचे धान लावले जातात. त्यामुळे मे महिन्यात होणारी कापणी जून महिन्यापर्यंत लांबते. यात एकीकडे रबी हंगामातील उन्हाळी धानपिकाची कामे आटोपण्याची लगबग तर दुसरीकडे खरीप हंगामाची कामे करण्याची घाई, यात शेतकरी गोंधळून जातात. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले नाही, त्यांची खरीप हंगामाच्या कामाबाबत आघाडी असते. अशा परिस्थितीत रोवणीचे कामसुद्धा मागे पुढे असतात. काही पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी लावल्याने खरीप हंगामातील पीक कमी प्रमाणात होण्याची शक्यता असते. ही तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना म्हणून ज्यावर्षी उन्हाळी धानपीक घेण्यात येते, त्यावर्षी जलाशयातील पाणी शेतकऱ्यांना एक महिन्यापूर्वी सामान्यत: डिसेंबर महिन्यात पुरविले पाहिजे. तसेच कृषी विभागाने ९० ते १०० दिवसांच्या कालावधीच्या धानाची वाण विकसीत केले पाहिजे, अशी मागणी होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून धानाची वाण तयार केल्यास शेतीचे काम यशस्वीपणे होवू शकतात.