शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला असा सवाल शेतकरी करीत आहेत. 

ठळक मुद्देकीडरोग, परतीच्या पावसाचा फटका : लागवड खर्च भरुन निघणे झाले कठीण

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला. कीडरोगामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले असून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसारायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यावर्षी चांगले उत्पन्न होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र धान पिकांवर विविध कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. एका एकरामध्ये चार ते पाच पोती धान होत आहेत तर काही शेतकऱ्यांना १० ते १२ पोती धान होत आहे. मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला असा सवाल शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बँका, सोसायटीमधून कर्ज काढले. उत्पादन कमी प्रमाणात आल्याने कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती