शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 11, 2016 00:41 IST

सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक

कहाली ग्रामपंचायतचा ठराव : परतीच्या पावसामुळे धानाला फुटले कोंब सोनपुरी : सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक वेळा अतिवृष्टीही झाली. सध्याच्या पावसामुळे तर धानाला कोंब फुटत असून शेतकऱ्यांच्या हाती किती धान लागेल याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. कहाली ग्रामपंचायतने तसा ठरावही घेतला. कहालीसह परिसरातील अनेक गावात गेल्या १० दिवसांपासून पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे धानाचे अतोनात नुकसान झाले आहे. हलक्या जातीचे धान कापण्याच्या स्थितीमध्ये आहे. पण सतत पावसात राहून धानाला कोंब फुटले आहे. बांधीत पाणी साचल्याने धान कापणीला अडथडे निर्माण होत आहे. अशा स्थितीत कापणी करायची कशी? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. कहाली ग्राम पंचायत येथे सरपंच कोतिका दसाराम मोहारे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासन स्तरावर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा ठराव घेण्यात आला. यावेळी उपसरपंच अर्चना संजय शहारे, ग्रा.पं.सदस्य घनश्याम मोहारे, झनकलाल उपराडे, प्रितम बनोठे, रामचंद सुलाखे, विमला सुलाखे, सरिता देवराज मरस्कोल्हे, महेश्वरी ठरकेले, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबूलाल मडावी, ग्रामसेवक राठोड उपस्थित होते. यावेळी सालेकसा तालुका व कहाली गावाला ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. ठराव तहसीलदार सालेकसा यांना देण्यात आला. आता जिल्हा प्रशासन यावर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर) हलक्या धानाची माती शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातही शेंडा परिसरात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन सर्व्हेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीेला आले आहे. भारी जातीचे धान निसव्यावरच लोटले आहे. हलक्या धानाची कापणीही काही शेतकऱ्यांनी केली, परंतु सतत येणाऱ्या पावसामुळे धानाच्या कड्या पाण्यात बुडून धानाला अंकूर फुटले आहे. त्यामुळे धान मातीमोल झाले आहे. या परिसरातील शेंडा, कोयलारी, कोहलीपार, मरसरामटोला, आबझारीटोला, मोहघाटा, प्रधानटोला, पांढरवाणी, उशीखेडा व कन्हारपायली येथील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या सिंचनाच्या सोयी आहेत. त्यामुळे निसर्गावर अवलंबून न राहता मृग नक्षत्रात पऱ्हे टाकून लवकरच रोवणी आटोपतात. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात हलके धान कापणीला येते. सध्या सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीला आले आहे. काहींनी कापूनही टाकले. अशातच सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला.कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकटाची भिती निर्माण झाली नाही. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे खासदार अडीच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही या क्षेत्राकडे ढुंकून पहायला तयार नाही. पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे, त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्या अशी अपेक्षा केली जात आहे.सौंदड परिसरातही फुटाळा शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. कापणीला आलेला धान जमीनदोस्त झाल्याने जागीच धान पीक राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. (वार्ताहर)