शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 11, 2016 00:41 IST

सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक

कहाली ग्रामपंचायतचा ठराव : परतीच्या पावसामुळे धानाला फुटले कोंब सोनपुरी : सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक वेळा अतिवृष्टीही झाली. सध्याच्या पावसामुळे तर धानाला कोंब फुटत असून शेतकऱ्यांच्या हाती किती धान लागेल याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. कहाली ग्रामपंचायतने तसा ठरावही घेतला. कहालीसह परिसरातील अनेक गावात गेल्या १० दिवसांपासून पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे धानाचे अतोनात नुकसान झाले आहे. हलक्या जातीचे धान कापण्याच्या स्थितीमध्ये आहे. पण सतत पावसात राहून धानाला कोंब फुटले आहे. बांधीत पाणी साचल्याने धान कापणीला अडथडे निर्माण होत आहे. अशा स्थितीत कापणी करायची कशी? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. कहाली ग्राम पंचायत येथे सरपंच कोतिका दसाराम मोहारे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासन स्तरावर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा ठराव घेण्यात आला. यावेळी उपसरपंच अर्चना संजय शहारे, ग्रा.पं.सदस्य घनश्याम मोहारे, झनकलाल उपराडे, प्रितम बनोठे, रामचंद सुलाखे, विमला सुलाखे, सरिता देवराज मरस्कोल्हे, महेश्वरी ठरकेले, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबूलाल मडावी, ग्रामसेवक राठोड उपस्थित होते. यावेळी सालेकसा तालुका व कहाली गावाला ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. ठराव तहसीलदार सालेकसा यांना देण्यात आला. आता जिल्हा प्रशासन यावर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर) हलक्या धानाची माती शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातही शेंडा परिसरात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन सर्व्हेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीेला आले आहे. भारी जातीचे धान निसव्यावरच लोटले आहे. हलक्या धानाची कापणीही काही शेतकऱ्यांनी केली, परंतु सतत येणाऱ्या पावसामुळे धानाच्या कड्या पाण्यात बुडून धानाला अंकूर फुटले आहे. त्यामुळे धान मातीमोल झाले आहे. या परिसरातील शेंडा, कोयलारी, कोहलीपार, मरसरामटोला, आबझारीटोला, मोहघाटा, प्रधानटोला, पांढरवाणी, उशीखेडा व कन्हारपायली येथील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या सिंचनाच्या सोयी आहेत. त्यामुळे निसर्गावर अवलंबून न राहता मृग नक्षत्रात पऱ्हे टाकून लवकरच रोवणी आटोपतात. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात हलके धान कापणीला येते. सध्या सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीला आले आहे. काहींनी कापूनही टाकले. अशातच सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला.कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकटाची भिती निर्माण झाली नाही. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे खासदार अडीच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही या क्षेत्राकडे ढुंकून पहायला तयार नाही. पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे, त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्या अशी अपेक्षा केली जात आहे.सौंदड परिसरातही फुटाळा शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. कापणीला आलेला धान जमीनदोस्त झाल्याने जागीच धान पीक राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. (वार्ताहर)