शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 11, 2016 00:41 IST

सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक

कहाली ग्रामपंचायतचा ठराव : परतीच्या पावसामुळे धानाला फुटले कोंब सोनपुरी : सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक वेळा अतिवृष्टीही झाली. सध्याच्या पावसामुळे तर धानाला कोंब फुटत असून शेतकऱ्यांच्या हाती किती धान लागेल याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. कहाली ग्रामपंचायतने तसा ठरावही घेतला. कहालीसह परिसरातील अनेक गावात गेल्या १० दिवसांपासून पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे धानाचे अतोनात नुकसान झाले आहे. हलक्या जातीचे धान कापण्याच्या स्थितीमध्ये आहे. पण सतत पावसात राहून धानाला कोंब फुटले आहे. बांधीत पाणी साचल्याने धान कापणीला अडथडे निर्माण होत आहे. अशा स्थितीत कापणी करायची कशी? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. कहाली ग्राम पंचायत येथे सरपंच कोतिका दसाराम मोहारे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासन स्तरावर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा ठराव घेण्यात आला. यावेळी उपसरपंच अर्चना संजय शहारे, ग्रा.पं.सदस्य घनश्याम मोहारे, झनकलाल उपराडे, प्रितम बनोठे, रामचंद सुलाखे, विमला सुलाखे, सरिता देवराज मरस्कोल्हे, महेश्वरी ठरकेले, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबूलाल मडावी, ग्रामसेवक राठोड उपस्थित होते. यावेळी सालेकसा तालुका व कहाली गावाला ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. ठराव तहसीलदार सालेकसा यांना देण्यात आला. आता जिल्हा प्रशासन यावर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर) हलक्या धानाची माती शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातही शेंडा परिसरात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन सर्व्हेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीेला आले आहे. भारी जातीचे धान निसव्यावरच लोटले आहे. हलक्या धानाची कापणीही काही शेतकऱ्यांनी केली, परंतु सतत येणाऱ्या पावसामुळे धानाच्या कड्या पाण्यात बुडून धानाला अंकूर फुटले आहे. त्यामुळे धान मातीमोल झाले आहे. या परिसरातील शेंडा, कोयलारी, कोहलीपार, मरसरामटोला, आबझारीटोला, मोहघाटा, प्रधानटोला, पांढरवाणी, उशीखेडा व कन्हारपायली येथील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या सिंचनाच्या सोयी आहेत. त्यामुळे निसर्गावर अवलंबून न राहता मृग नक्षत्रात पऱ्हे टाकून लवकरच रोवणी आटोपतात. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात हलके धान कापणीला येते. सध्या सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीला आले आहे. काहींनी कापूनही टाकले. अशातच सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला.कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकटाची भिती निर्माण झाली नाही. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे खासदार अडीच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही या क्षेत्राकडे ढुंकून पहायला तयार नाही. पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे, त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्या अशी अपेक्षा केली जात आहे.सौंदड परिसरातही फुटाळा शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. कापणीला आलेला धान जमीनदोस्त झाल्याने जागीच धान पीक राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. (वार्ताहर)