शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:51 IST

तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष : शासनाला पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.जिल्ह््यात मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस अद्याप पडलेला नाही. यामुळे शेतीची कामे अडली असून पेरणी वाळत आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असतानाही शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन पाठवून जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांतर्गत शुक्रवारी (दि.२६) माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, अशोक गुप्ता, जितेंश टेंभरे, केतन तुरकर, रजनी गौतम, अंचल गिरी, सुनील पटले, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, आशिष नागपुरे, प्रकाश देवाधारी, सुनिता दोनोडे, योगराज लिल्हारे, रवि पटले, शैलेंद्र वासनिक, पुनाप्रसाद लिल्हारे, नरेंद्र चिखलोंडे, रमेश गौतम, पुरनलाल उके, करण टेकाम, आरजू मेश्राम, आसीफ सय्यद, छन्नू येळे, धरमलाल रहांगडाले, तेजराम मडामे, हिरामन बावनकर, विकास गेडाम, दुर्याधन मेश्राम, प्रदीप रोकडे, नितीन टेंभरे, सतीश कोल्हे, मदन चिखलोंडे, शोभा गणवीर, विनायक खैरे, रमेश कुरील, नागो बंसोड, लखन बहेलिया, राजेश रहांगडाले, विजय ठाकूर, उमराव भगत, पंकज चौधरी, राजेश चौळे यांच्यासह कार्यकर्ता उपस्थित होते.एकरी २५ हजार रूपये भरपाई द्याराष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्या, सरसकट कर्जमाफी देऊन कृषी वीज बिल माफ करा, २४ तास वीज पुरवठा करा, धानाला तीन हजार रूपये हमी भाव द्या, शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध करवून द्या, रब्बी धानाला ७०० रूपये बोनस द्या, तालुक्याचे सर्वेक्षण करून त्वरी नुकसान भरपाई द्या, तालुक्यात रोजगार निर्मिती करून बेरोजगारी दूर करा, एमआरईजीएसचे प्रलंबीत देयक त्वरीत द्या, आरोग्य सेवेत सुधारणा करा, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून सर्व सामान्यांना सोय उपलब्ध करून द्या आदि मागण्यांना समावेश आहे.अन्यथा रस्त्यावरून तीव्र आंदोलन- जैनजिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना शासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे. अशात शेतकºयांना मदतीचा हात पुढे करून शेतकºयांच्या हितार्थ आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात याव्या. अन्यथा रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणार, असा इशारा निवेदन देताना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस