शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:51 IST

तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष : शासनाला पाठविले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले.जिल्ह््यात मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस अद्याप पडलेला नाही. यामुळे शेतीची कामे अडली असून पेरणी वाळत आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असतानाही शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून शासनाला निवेदन पाठवून जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांतर्गत शुक्रवारी (दि.२६) माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, अशोक गुप्ता, जितेंश टेंभरे, केतन तुरकर, रजनी गौतम, अंचल गिरी, सुनील पटले, जगदीश बहेकार, अखिलेश सेठ, आशिष नागपुरे, प्रकाश देवाधारी, सुनिता दोनोडे, योगराज लिल्हारे, रवि पटले, शैलेंद्र वासनिक, पुनाप्रसाद लिल्हारे, नरेंद्र चिखलोंडे, रमेश गौतम, पुरनलाल उके, करण टेकाम, आरजू मेश्राम, आसीफ सय्यद, छन्नू येळे, धरमलाल रहांगडाले, तेजराम मडामे, हिरामन बावनकर, विकास गेडाम, दुर्याधन मेश्राम, प्रदीप रोकडे, नितीन टेंभरे, सतीश कोल्हे, मदन चिखलोंडे, शोभा गणवीर, विनायक खैरे, रमेश कुरील, नागो बंसोड, लखन बहेलिया, राजेश रहांगडाले, विजय ठाकूर, उमराव भगत, पंकज चौधरी, राजेश चौळे यांच्यासह कार्यकर्ता उपस्थित होते.एकरी २५ हजार रूपये भरपाई द्याराष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्या, सरसकट कर्जमाफी देऊन कृषी वीज बिल माफ करा, २४ तास वीज पुरवठा करा, धानाला तीन हजार रूपये हमी भाव द्या, शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध करवून द्या, रब्बी धानाला ७०० रूपये बोनस द्या, तालुक्याचे सर्वेक्षण करून त्वरी नुकसान भरपाई द्या, तालुक्यात रोजगार निर्मिती करून बेरोजगारी दूर करा, एमआरईजीएसचे प्रलंबीत देयक त्वरीत द्या, आरोग्य सेवेत सुधारणा करा, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून सर्व सामान्यांना सोय उपलब्ध करून द्या आदि मागण्यांना समावेश आहे.अन्यथा रस्त्यावरून तीव्र आंदोलन- जैनजिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना शासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे. अशात शेतकºयांना मदतीचा हात पुढे करून शेतकºयांच्या हितार्थ आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात याव्या. अन्यथा रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करणार, असा इशारा निवेदन देताना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस