शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

अनंतने केला धिंगाण्यांचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 00:31 IST

घरातील एकाला जडलेल्या व्यसनामुळे घरातील सर्व कुटुंबाला भूर्दंड सहन करावा लागतो.

दारूड्यांनी धरली मंदिराची वाट : आजोबा व भावाच्या व्यसनामुळे उचलले पाऊलनरेश रहिले गोंदियाघरातील एकाला जडलेल्या व्यसनामुळे घरातील सर्व कुटुंबाला भूर्दंड सहन करावा लागतो. आपण उच्च शिक्षण घेऊन समाजात नाव लौकीक करण्याची जिद्द बाळगत असताना घरातील आजोबा व भावाच्या व्यसनामुळे त्यांना त्रास व्हायचा. गावातील चौकाचौकात सायंकाळी धिंगाणा घालणाऱ्यांना मंदिराची वाट धरण्यासाठी एकट्याने गावाला जागविले. सायंकाळच्या वेळी गावात धिंगाणा घालणाऱ्या लोकांना सन्मार्गाकडे वळविण्याचे काम गोरेगाव तालुक्याच्या पुरगाव येथील अनंतकुमार देवेंद्र ठाकरे या उच्च शिक्षीत तरूणाने केले. व्यसनमुक्तीचा अनंतकुमारने उचलेला विडा गावात लोकचळवळ होऊन बसला. त्यामुळे तो गावातील नागरिकांचा लाडका झाला.मोटारसायकल मॅकेनिक म्हणून काम करणारे अनंतकुमार ठाकरे यांचे आजोबा, आजोबांचे भाऊ व त्यांचे भाऊ सन २००९ मध्ये मद्यसेवन करीत होते. त्यामुळे घराचे स्वास्थ बिघडले होते. गावातही अवैध दारूचा महापूर वाहत असल्याने गावातील चौकाचौकात दारूड्यांचा सायंकाळी व रात्री धिंगाणा असायचा. त्यावेळी गावातील एखादी तरूणी चौकातून जाऊ शकत नव्हती अशी अवस्था गावची होती. अशात गावकऱ्यांची दारूपासून मुक्ती करण्याचा चंग अनंतकुमारने बांधला. ग्रामपंचायत व आंगणवाडी समोर दारू दुकान होते. त्या दारू दुकानाचा विद्यार्थी मनावर विपरीत परिणाम पडत होता. ग्रामपंचायतमध्ये याच रस्त्यावरून जावे लागत असल्याने दारूड्यांचे नागरिकांसोबत वाद व्हायचे. त्यामुळे व्यसनापासून दूर असलेल्या लोकांना गाव सोडावे लागले किंवा त्यांना घरात राहावे लागले. गावच्या या परिस्थितीवर अनंतकुमारने विचार करून गावातील अनिल पारधी, शिवशंकर ठाकरे, कमलेश बिसेन, राजेंद्र पारधी, संजय मेश्राम यांना सोबत घेऊन गावातील जेष्ठ नागरिक रामजी वाघाडे, शिवराम तुरकर यांच्या मार्गदर्शनात बैठक घेतली. या बैठकीनंतर दारूबंदी होत होती परंतु आठ-दहा दिवसानंतर पुन्हा दारूविक्री सुरू व्हायची. दारूमुळे होणाऱ्या हाणीची माहिती लोकांना देण्याचे चार-पाच लोकांनी ठरविले. त्यामुळे लोक त्यांच्याशी जुळू लागले. परिणामी एकेकाळी दारूपिऊन धिंगाणा घालणाऱ्या पूरगावात शांतता नांदू लागली आहे. २५ लोकांची दारूला तिलांजलीपूरगावात मागील सात-आठ वर्षात नऊ लोकांचा मृत्यू झाला. हे बघता गावातील २५ लोकांनी दारूला तिलांजली दिली.त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.समाजातही त्यांचा मान आता वाढला आहे. अनंतकुमारने गावात दारूबंदी सुरू केली. याची भनक अवैध दारूविक्रेत्यांना लागताच त्यांना पैशांचे आमिष देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १५ हजार रूपये घेऊन दारूविक्रेते त्यांच्याकडे गेले होते. परंतु त्यांनी एकही न ऐकता गावाला व्यसनमुक्त करणे हाच माझे पुरस्कार आहे असल्याचे स्पष्ट सांगीतले. १४ मे २०१० च्या ग्रामसभेत केली टिंगलया विषयाला घेऊन विशेष ग्रामसभा बोलाविण्याची मागणी केली होती. त्यावर काही लोकांनी टिंगल केली. १४ मे २०१० रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ३५० महिलांनी भाग घेतला होता. दारूबंदी समिती तयार करण्यात आली. वर्गणी गोळा करून बोर्ड तयार करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला १५ दिवसात एक व्यक्ती पकडण्यात आला. पोलिसांनी समितीवर दबाव आणला होता. परंतु तत्कालीन पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक यांनी या तरूणांना सहकार्य केले होते.तरूण दारूपासून दूरगाव दारूमुक्त करण्यासाठी रात्रीच्यावेळी झाडावर चढून दारूविक्रेत्याला पकडण्यासाठी रात्र जागून काढावी लागत होती. १५ रूपयांचा टॉर्च खरेदी करून महिलांच्या मदतीने दारूविक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात येत होते. दारूपिणाऱ्यांवर २५० रूपये दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. अनेक प्रकरण पोलीस ठाण्यात जात होते. दंड वसूल झाल्यास त्या राशीतून गावातील दुर्बल घटकांना मदत केली जात होती. दारूविक्रेत्यांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी गावात अनेक संभ्रम पसरविले होते. परंतु दारूविक्रेत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. दोन वर्षानंतर गावात व्यसनमुक्तीचा संकल्प दिवस साजरा करण्यात आला.