शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ग्रामीण भागातूनच लोकनाट्य व लोककलेचा कलावंत घडला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 13:46 IST

कलेची परंपरा कायम; हौशी कलाकारांचाही मानसन्मान

मुन्नाभाई नंदागवळी

बाराभाटी (गोंदिया) : झाडीपट्टी असो किंवा आपला विदर्भ या मातीत अनेक नामवंत कलावंत घडले आहेत. या मातीने हौशी कलावंतांपासून तर चित्रपटसृष्टीतील कलाकार घडविले आहेत. अनेकांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेण्याचे काम या झाडीपट्टीतील कलावंतांपासून प्राप्त झाले आहे. खरा कलाकार हा लोकनाट्य व लोककलेमुळे निर्माण झाला आहे. यातून कलाकारांना मोठे यश गाठता आले म्हणूनच ग्रामीण भागातूनच लोकनाट्य व लोककलेचा कलावंत उत्तम घडला आहे.

दिवसभराच्या कष्टाने दमलेल्या माणसांची पावले सायंकाळ झाल्यावर देवळाकडे वळायची. भजन आणि कीर्तनात रंगणारी ती माणसे कधीकधी कीर्तन, भारूडातील प्रसंगांनी खदखदून हसू लागायची. तमाशा, लावणीने देहभान हरपून जायची. पोवाड्यांनी अंगावर शहारे उभे राहायचे. धकाधकीच्या, कष्टाच्या, दुःखाच्या क्षणांनी भांबावलेल्या मराठी माणसाला आपल्या कलांद्वारे मोहीत करण्याची किमया साधणाऱ्या या लोककला आणि लोककलावंत आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. गोंधळ, जागरण, तमाशा, लावणी, भजन, कीर्तन, बाल्या नृत्य, दशावतारी खेळ, लळीत या काही प्रमुख लोककलांनी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचे मन रिझवून टाकले. त्या जोडीला वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, भुत्या, नंदीबैलवाला, शाहीर, सुंबरान गाणारे धनगर, पोतराज, कडकलक्ष्मी यांनीही मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले. लोककला या संबंधित संस्कृतीच्या प्रवाहक असतात.

जागरण गोंधळाला पसंती आजही

गोंधळाबरोबरच जागरणाला महत्त्वाचे स्थान आहे. कुळधर्म कुलाचार पाळला जावा म्हणून जागरण केले जाते. आपापल्या कुलस्वामीला जागृत करणे म्हणजे जागरण. घरामध्ये शुभकार्याच्या वेळी जागरण गोंधळ घातला जातो. त्याप्रमाणे दर वर्षाला किंवा तीन वर्षांनी कुळधर्म कुलाचारावेळी जागरण गोंधळ घातला जातो.

लावणी तर महाराष्ट्राची शान

गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा संगम असलेली लावणी हा लोकप्रिय कलाप्रकार आहे. तमाशाचा भाग म्हणूनही लावणी सादर केली जाते. शृंगारावर आधारलेल्या लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बालक्रीडेचे अभंग यात आढळून येते. शाहिरांनी या लावण्यांची लज्जत वाढवली. शृंगारीकच नव्हे, तर भक्तीरस, वीररस, वात्सल्यरस असलेल्या लावण्याही शाहिरांनी रचल्या. लावणीविषयी असे म्हटले जाते की, लवण म्हणजे मीठ आणि मीठाशिवाय जेवणाला चव नाही. त्याप्रमाणे लावणीशिवाय मनोरंजनाच्या कार्यक्रमाला लज्जत येत नाही. मात्र, सध्याची लावणी आणि लावणी कलावंत यांची स्थिती दयनीय झाली आहे.

तमाशातून कलावंत जगतोय

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलेत तमाशाचा उल्लेख करावा लागतो. गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांचा परिपोष असलेली ही लोककला आहे. तमाशा हा मूळ शब्द अरबी आहे. त्याचा अर्थ दृश्य, खेळ किंवा नाट्यप्रयोग असा आहे. या खेळात गण- गौळण, रंगबाजी आणि वग अशा तीन प्रकारच्या नाट्यांनी रंगत येत असते. गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. गण संपल्यावर ढोलकी वादन होते. त्यानंतर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते. त्यानंतर गौळण. रंगबाजी म्हणजे रंगमंचावर होणारे श्रृंगारीक लावण्यांचे सादरीकरण.

कीर्तनातून आजही प्रबोधन सुरूच

परमेश्वर आणि थोर विभूतींचे गुणगान; तसेच पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन लोककला प्रकार आहे. काव्य, संगीत, अभिनय आणि काहीवेळा नृत्य यांच्या संगमातून सादर झालेले कथारूप एकपात्री निवेदन म्हणजे कीर्तन. कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तनाला मोठी परंपरा आहे. भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा प्रारंभ केला. त्यांनी महर्षी व्यासांना ही लोककला शिकवली.

भारूडाचीही छाप कायम

रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सांगणारी लोककला म्हणजे भारूड. समाजाला समजेल, अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगून सदाचार आणि नीतिवर भर देणारे असे भारूड आहे. जीवनाचे अवलोकन आणि चिंतन भारूडांमधून व्यक्त झालेले दिसते. संतांनी समाजप्रबोधनपर भारूडे रचून लोकांच्या डोळ्यांत अंजन घातले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव या संत एकनाथपूर्व आणि संत तुकाराम आणि संत रामदास या संत एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारूडे रचली. संत एकनाथांनी भारूडात विविधता आणली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकdanceनृत्य