शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

गोंदिया : मानवी शरीरातील सर्वच आजारांवर प्राणायामातून मात करता येते. परंतु सुरुवातीपासूनच शरीराला व्यायामाची गरज आहे. प्राणायाममुळे श्वसन ...

गोंदिया : मानवी शरीरातील सर्वच आजारांवर प्राणायामातून मात करता येते. परंतु सुरुवातीपासूनच शरीराला व्यायामाची गरज आहे. प्राणायाममुळे श्वसन संस्था, रक्तसंचार संस्था सर्व सक्रिय होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. कोरोनामध्ये प्राणायामामुळे फुफ्फुसात शुद्ध हवा व दूषित कार्बनडाय ऑक्साईड हे बाहेर टाकले जाते. शरीराची शुद्धी प्राण्यांमुळे हेाते. मनुष्याचे आयुष्य श्वासावर निर्भर असल्यामुळे प्राणायामांचा अभ्यास करणे अधिक गरजेचे आहे. अनुलोम-विलोम प्राणायामामुळे नाक व फुफ्फुसातील दोष नष्ट होतात. सर्दी राहत नाही. श्वसन योग्य होत असल्यामुळे मन शांत राहते. सर्व रोगांवर पाॅवरफुल औषधी म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविते आंतरिक शक्ती वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढवितो. सर्व विकारांवर रामबाण उपाय म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम केले जाते. नाडी शोधन प्राणायामामुळे सर्व नाडी आणि धमन्यांची शुद्धी होते. रक्तसंचार योग्य राहतो. मन एकाग्र होते. शरीरात स्फूर्ती राहते. नाशिकच्या अग्रभागी सुगंधाचा अनुभव होतो. कपालभाती प्राणायामामुळे दोन विधी आहेत. कपालभातीमुळे पचनास मदत, कफ रोग दूर होणे, तिन्ही दिशांना हा नष्ट करतो. उष्णता देतो, रक्त रुग्णांसाठी ४-५ मिनिट केल्यास याचा लाभ होतो. कोविड दूर करण्यासाठी प्राणायाम महत्त्वपूर्ण आहे. या योगामुळे भूक वाढते. श्वासाचे रोगही दूध होतात. उज्जायी प्राणायाम या प्राण्यामुळे सर्दी, खाेकला, गळ्याचे रोग, दमासंबंधी सर्व रोग दूर होतात. गळ्याचे विकार दूर होतात. मनुष्यासाठी प्राणायाम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

......................................

नियमित प्राणायम केल्याचे फायदे

१) - सूर्यभेदन प्राणायाम हा प्राणायाम कफ नष्ट करतो, सर्दी, गळ्याचा त्रास, पोटदुखी, पोटातील किडे दूर करतो. पित्त प्रकृती, कुंडलिनी जागृतीसाठी सूर्यभेदन प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.

२)- प्राणायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंतरिक शक्ती वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढवितो. सर्व विकारांवर रामबाण उपाय म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम केले जाते.

३)- प्राणायामामुळे रक्तसंचार योग्य राहते. मन एकाग्र होते. शरीरात स्फूर्ती राहते. नाशिकच्या अग्रभागी सुगंधाचा अनुभव होतो. कपालभाती प्राणायामामुळे पचनास मदत, कफ रोग दूर होतो.

..........................

प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात

..................

दररोज सकाळी,सायंकाळी प्राणायाम करून शरीरातील सर्व रोग दूर करता येते. प्रत्येकाने योगाकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम केल्याने मनुष्य निरोगी राहतो. कुठलेही रोग आपल्यापर्यंत योगामुळे पोहचत नाहीत.

डाॅ. माधुरी वानकर (परमार), योग व निसर्गोपचार तज्ज्ञ गोंदिया.

.................................

शरीरात ऑक्सिजन वाढविण्यासाठी, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित प्राणायाम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांनी प्राणायाम करून आपला कोरोना दूर केला. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम सर्वांनी नियमित करावे.

प्रा. अर्चना चिंचाळकर, योग शिक्षिका आमगाव.

.......................................

योग हा एक आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. रोज आपल्याला प्राणायाम करायला पाहिजे. मी नियमित प्राणायाम करीत असल्यामुळे निरोगी आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही डॉक्टरांकडे जायला लागू नये म्हणून योग, प्राणायाम केले.

अनिता आईंद्रेवार, नियमित योग करणारे नागरिक

.............................

योगामुळे कोरोना विषाणूपासूनही आपला बचाव करता येतो. कोरोना झाला तरी नियमित प्राणायाम व योग करणाऱ्यांवर तो भारी पडणार नाही. मी नियमित योग करते. योग व प्राणायाममुळे मोठ्याही आजाराशी आपण लढू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे.

तोषिका पटले, नियमित योग करणारे नागरिक

....