शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

गोंदिया : मानवी शरीरातील सर्वच आजारांवर प्राणायामातून मात करता येते. परंतु सुरुवातीपासूनच शरीराला व्यायामाची गरज आहे. प्राणायाममुळे श्वसन ...

गोंदिया : मानवी शरीरातील सर्वच आजारांवर प्राणायामातून मात करता येते. परंतु सुरुवातीपासूनच शरीराला व्यायामाची गरज आहे. प्राणायाममुळे श्वसन संस्था, रक्तसंचार संस्था सर्व सक्रिय होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. कोरोनामध्ये प्राणायामामुळे फुफ्फुसात शुद्ध हवा व दूषित कार्बनडाय ऑक्साईड हे बाहेर टाकले जाते. शरीराची शुद्धी प्राण्यांमुळे हेाते. मनुष्याचे आयुष्य श्वासावर निर्भर असल्यामुळे प्राणायामांचा अभ्यास करणे अधिक गरजेचे आहे. अनुलोम-विलोम प्राणायामामुळे नाक व फुफ्फुसातील दोष नष्ट होतात. सर्दी राहत नाही. श्वसन योग्य होत असल्यामुळे मन शांत राहते. सर्व रोगांवर पाॅवरफुल औषधी म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविते आंतरिक शक्ती वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढवितो. सर्व विकारांवर रामबाण उपाय म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम केले जाते. नाडी शोधन प्राणायामामुळे सर्व नाडी आणि धमन्यांची शुद्धी होते. रक्तसंचार योग्य राहतो. मन एकाग्र होते. शरीरात स्फूर्ती राहते. नाशिकच्या अग्रभागी सुगंधाचा अनुभव होतो. कपालभाती प्राणायामामुळे दोन विधी आहेत. कपालभातीमुळे पचनास मदत, कफ रोग दूर होणे, तिन्ही दिशांना हा नष्ट करतो. उष्णता देतो, रक्त रुग्णांसाठी ४-५ मिनिट केल्यास याचा लाभ होतो. कोविड दूर करण्यासाठी प्राणायाम महत्त्वपूर्ण आहे. या योगामुळे भूक वाढते. श्वासाचे रोगही दूध होतात. उज्जायी प्राणायाम या प्राण्यामुळे सर्दी, खाेकला, गळ्याचे रोग, दमासंबंधी सर्व रोग दूर होतात. गळ्याचे विकार दूर होतात. मनुष्यासाठी प्राणायाम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

......................................

नियमित प्राणायम केल्याचे फायदे

१) - सूर्यभेदन प्राणायाम हा प्राणायाम कफ नष्ट करतो, सर्दी, गळ्याचा त्रास, पोटदुखी, पोटातील किडे दूर करतो. पित्त प्रकृती, कुंडलिनी जागृतीसाठी सूर्यभेदन प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.

२)- प्राणायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंतरिक शक्ती वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढवितो. सर्व विकारांवर रामबाण उपाय म्हणून अनुलोम-विलोम प्राणायाम केले जाते.

३)- प्राणायामामुळे रक्तसंचार योग्य राहते. मन एकाग्र होते. शरीरात स्फूर्ती राहते. नाशिकच्या अग्रभागी सुगंधाचा अनुभव होतो. कपालभाती प्राणायामामुळे पचनास मदत, कफ रोग दूर होतो.

..........................

प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात

..................

दररोज सकाळी,सायंकाळी प्राणायाम करून शरीरातील सर्व रोग दूर करता येते. प्रत्येकाने योगाकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम केल्याने मनुष्य निरोगी राहतो. कुठलेही रोग आपल्यापर्यंत योगामुळे पोहचत नाहीत.

डाॅ. माधुरी वानकर (परमार), योग व निसर्गोपचार तज्ज्ञ गोंदिया.

.................................

शरीरात ऑक्सिजन वाढविण्यासाठी, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित प्राणायाम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांनी प्राणायाम करून आपला कोरोना दूर केला. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम सर्वांनी नियमित करावे.

प्रा. अर्चना चिंचाळकर, योग शिक्षिका आमगाव.

.......................................

योग हा एक आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. रोज आपल्याला प्राणायाम करायला पाहिजे. मी नियमित प्राणायाम करीत असल्यामुळे निरोगी आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही डॉक्टरांकडे जायला लागू नये म्हणून योग, प्राणायाम केले.

अनिता आईंद्रेवार, नियमित योग करणारे नागरिक

.............................

योगामुळे कोरोना विषाणूपासूनही आपला बचाव करता येतो. कोरोना झाला तरी नियमित प्राणायाम व योग करणाऱ्यांवर तो भारी पडणार नाही. मी नियमित योग करते. योग व प्राणायाममुळे मोठ्याही आजाराशी आपण लढू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे.

तोषिका पटले, नियमित योग करणारे नागरिक

....