शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

२ लाख शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात रक्कम होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 15:35 IST

राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम केली जाणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गोंदिया येथे सांगितले.

ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांची ग्वाहीकर्जमाफीच्या अर्जांमध्ये त्रुटी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात गुरूवार (दि.२६) पासून रक्कम जमा केली जाणार होती. यासाठी राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननीे करण्यात आली. मात्र ६ लाख ५० हजार अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्याने आता यापैकी केवळ २ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम केली जाणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गोंदिया येथे सांगितले.गुरूवारी ते गोंदिया येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते. यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस राज्यातील ८७ लाख शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी ७७ लाख शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. शेतकऱ्यांनी केलेले आॅनलाईन अर्ज आणि आधारक्रमांक यात पडताळणी दरम्यान प्रचंड तफावत आढळली. बँका व आॅनलाईन अर्जातील माहिती जुळत नसल्याने कर्जमाफीची रक्कम देण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवार (दि.२६)पासून पहिल्या टप्प्यात ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र कर्जमाफीच्या अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्याने ८ लाख ५० अर्जांच्या छाननीनंतर २ लाख अर्जांमध्ये कुठल्याच त्रृट्या आढळल्या नाही. त्यामुळे या २ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्जमाफीचा लाभ अपात्र शेतकऱ्यांना मिळू नये आणि योग्य लाभार्थी वंचित राहू नये,यासाठी कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास विलंब होत असल्याचे सांगत देशमुख यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.दररोज एक तास होणार अर्जांची छाननीकर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आॅनलाईन अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या आढळल्या. एकाच आधार क्रमांकाचे पाच पाच अर्ज अपलोड केले आहेत. त्यामुळे या अर्जांची योग्य छाननी करण्याचे निर्देश बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाला दिले आहेत. बँक आणि संबंधित विभागाचे आयटी अधिकारी दररोज एकतास या अर्जांची छाननी करणार आहेत. त्यानंतर दररोज जेवढे अर्ज पात्र ठरतील तेवढ्या शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी