शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव तालुका वार्तापत्र-वाचविण्यासाठी दबावतंत्र नको

By admin | Updated: May 9, 2014 03:16 IST

अलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे

 ओ.बी.डोंगरवार■ आमगावअलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे तो सध्या येथे चर्चेचा विषय आहे. त्यासाठी आपली ताकत पणाला लावली जात आहे. याची कुणकुण कानावर आल्याने यात जे काही सुरु आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार सत्तारुढ पंचायत समिती सदस्यांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे येणार्‍या पंचायत समिती निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.आमगाव पंचायत समितीमध्ये एका पक्षाची सत्ता अनेक वर्र्षांपासून आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे 'मेरे मुर्गी की एक ही टांग' असा विचार कार्यरत पं.स. सदस्यांनी करायला नको. एका पंचायत समिती सदस्याच्या पतीवर जर खंडविकास अधिकार्‍यांनी थोडी कारवाही केली तर त्याच्यावर खूप रोष, नाराजी वगैरे व्यक्त करण्यात आली. मासिक सभेच्या बैठकीत हे चित्र समोर आले. मात्र कारवाई झाली ती योग्यच होती, असेही मत काही सत्तारुढ गटातील पं.स. सदस्यांनी व्यक्त केले. मात्र काहींनी झालेली कारवाई मागे घ्या, असा आग्रह केला आहे.कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर जर अधिकार्‍यांनी कारवाई केली तर नवल काही नाही. ज्याच्यावर कारवाई झाली त्या पं.स.सदस्याच्या पतीचे शाळेला बुट्टी मारणे, केव्हाही काम सांगुन पं.स. मध्ये येणे ही नित्याची बाब झाली होती. मात्र त्यांच्यावर खंडविकास अधिकार्‍यांनी कारवाही केली तर वाईट वाटण्यासारखे काही नाही. असे असताना मासिक बैठकीत त्यांच्यावरील कारवाई मागे घ्या, असे म्हणून हंगामा करणे कितपत योग्य आहे, ते सदस्यांनी ठरवावे. आता याच पं.स. सदस्याचे एक पाऊल पुढे झाल्याने चक्क त्यांच्या वॉर्डातही रोष व्यक्त केला गेला.पंचायत समिती सदस्याला जिल्हा परिषदेकडून विकासात्मक कामांसाठी फंड मिळतो. त्याचा उपयोग तालुक्यात कुठेही करता येतो, यात काही दुमत नाही. मात्र मिळालेला फंड किंवा अनुदानाची दुसरी बाजू समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. जर पंचायत समिती सदस्याला मिळालेला फंड स्वत:चा स्वार्थ ठेऊन किंवा स्वत:च्या फायद्याकरिता जर कुणी उपयोगात आणत आहे, असे निदर्शनास आले तर त्या सदस्यत्वावर नियमानुसार कावाई झालीच पाहीजे. हेच कारण नाली बांधकामात झाले. बांधकाम केले त्यावर वॉर्डातील नागरिकांचा रोष नाही, मात्र मी निधी आणला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे काम होईल, कोणाला बोलण्याचा अधिकार नाही असे शब्द योग्य वाटत नाही. त्यामुळे शेवटी नाली बांधकाम बंद पडले. तात्पर्य हेच की, सत्ता हातात आहे म्हणून स्वत:चे हित जोपासून कामे करण्याऐवजी लोकांच्या फायद्याला प्राधान्य द्यावे.