शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

आमगाव तालुका वार्तापत्र-वाचविण्यासाठी दबावतंत्र नको

By admin | Updated: May 9, 2014 03:16 IST

अलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे

 ओ.बी.डोंगरवार■ आमगावअलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे तो सध्या येथे चर्चेचा विषय आहे. त्यासाठी आपली ताकत पणाला लावली जात आहे. याची कुणकुण कानावर आल्याने यात जे काही सुरु आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार सत्तारुढ पंचायत समिती सदस्यांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे येणार्‍या पंचायत समिती निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.आमगाव पंचायत समितीमध्ये एका पक्षाची सत्ता अनेक वर्र्षांपासून आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे 'मेरे मुर्गी की एक ही टांग' असा विचार कार्यरत पं.स. सदस्यांनी करायला नको. एका पंचायत समिती सदस्याच्या पतीवर जर खंडविकास अधिकार्‍यांनी थोडी कारवाही केली तर त्याच्यावर खूप रोष, नाराजी वगैरे व्यक्त करण्यात आली. मासिक सभेच्या बैठकीत हे चित्र समोर आले. मात्र कारवाई झाली ती योग्यच होती, असेही मत काही सत्तारुढ गटातील पं.स. सदस्यांनी व्यक्त केले. मात्र काहींनी झालेली कारवाई मागे घ्या, असा आग्रह केला आहे.कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर जर अधिकार्‍यांनी कारवाई केली तर नवल काही नाही. ज्याच्यावर कारवाई झाली त्या पं.स.सदस्याच्या पतीचे शाळेला बुट्टी मारणे, केव्हाही काम सांगुन पं.स. मध्ये येणे ही नित्याची बाब झाली होती. मात्र त्यांच्यावर खंडविकास अधिकार्‍यांनी कारवाही केली तर वाईट वाटण्यासारखे काही नाही. असे असताना मासिक बैठकीत त्यांच्यावरील कारवाई मागे घ्या, असे म्हणून हंगामा करणे कितपत योग्य आहे, ते सदस्यांनी ठरवावे. आता याच पं.स. सदस्याचे एक पाऊल पुढे झाल्याने चक्क त्यांच्या वॉर्डातही रोष व्यक्त केला गेला.पंचायत समिती सदस्याला जिल्हा परिषदेकडून विकासात्मक कामांसाठी फंड मिळतो. त्याचा उपयोग तालुक्यात कुठेही करता येतो, यात काही दुमत नाही. मात्र मिळालेला फंड किंवा अनुदानाची दुसरी बाजू समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. जर पंचायत समिती सदस्याला मिळालेला फंड स्वत:चा स्वार्थ ठेऊन किंवा स्वत:च्या फायद्याकरिता जर कुणी उपयोगात आणत आहे, असे निदर्शनास आले तर त्या सदस्यत्वावर नियमानुसार कावाई झालीच पाहीजे. हेच कारण नाली बांधकामात झाले. बांधकाम केले त्यावर वॉर्डातील नागरिकांचा रोष नाही, मात्र मी निधी आणला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे काम होईल, कोणाला बोलण्याचा अधिकार नाही असे शब्द योग्य वाटत नाही. त्यामुळे शेवटी नाली बांधकाम बंद पडले. तात्पर्य हेच की, सत्ता हातात आहे म्हणून स्वत:चे हित जोपासून कामे करण्याऐवजी लोकांच्या फायद्याला प्राधान्य द्यावे.