शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

आमगाव तालुका वार्तापत्र-वाचविण्यासाठी दबावतंत्र नको

By admin | Updated: May 9, 2014 03:16 IST

अलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे

 ओ.बी.डोंगरवार■ आमगावअलिकडे आमगाव पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्याला किंवा महिला सदस्याच्या पतीला वाचविण्यासाठी जो राजकिय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे तो सध्या येथे चर्चेचा विषय आहे. त्यासाठी आपली ताकत पणाला लावली जात आहे. याची कुणकुण कानावर आल्याने यात जे काही सुरु आहे ते योग्य की अयोग्य याचा विचार सत्तारुढ पंचायत समिती सदस्यांनी करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे येणार्‍या पंचायत समिती निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.आमगाव पंचायत समितीमध्ये एका पक्षाची सत्ता अनेक वर्र्षांपासून आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारे 'मेरे मुर्गी की एक ही टांग' असा विचार कार्यरत पं.स. सदस्यांनी करायला नको. एका पंचायत समिती सदस्याच्या पतीवर जर खंडविकास अधिकार्‍यांनी थोडी कारवाही केली तर त्याच्यावर खूप रोष, नाराजी वगैरे व्यक्त करण्यात आली. मासिक सभेच्या बैठकीत हे चित्र समोर आले. मात्र कारवाई झाली ती योग्यच होती, असेही मत काही सत्तारुढ गटातील पं.स. सदस्यांनी व्यक्त केले. मात्र काहींनी झालेली कारवाई मागे घ्या, असा आग्रह केला आहे.कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर जर अधिकार्‍यांनी कारवाई केली तर नवल काही नाही. ज्याच्यावर कारवाई झाली त्या पं.स.सदस्याच्या पतीचे शाळेला बुट्टी मारणे, केव्हाही काम सांगुन पं.स. मध्ये येणे ही नित्याची बाब झाली होती. मात्र त्यांच्यावर खंडविकास अधिकार्‍यांनी कारवाही केली तर वाईट वाटण्यासारखे काही नाही. असे असताना मासिक बैठकीत त्यांच्यावरील कारवाई मागे घ्या, असे म्हणून हंगामा करणे कितपत योग्य आहे, ते सदस्यांनी ठरवावे. आता याच पं.स. सदस्याचे एक पाऊल पुढे झाल्याने चक्क त्यांच्या वॉर्डातही रोष व्यक्त केला गेला.पंचायत समिती सदस्याला जिल्हा परिषदेकडून विकासात्मक कामांसाठी फंड मिळतो. त्याचा उपयोग तालुक्यात कुठेही करता येतो, यात काही दुमत नाही. मात्र मिळालेला फंड किंवा अनुदानाची दुसरी बाजू समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. जर पंचायत समिती सदस्याला मिळालेला फंड स्वत:चा स्वार्थ ठेऊन किंवा स्वत:च्या फायद्याकरिता जर कुणी उपयोगात आणत आहे, असे निदर्शनास आले तर त्या सदस्यत्वावर नियमानुसार कावाई झालीच पाहीजे. हेच कारण नाली बांधकामात झाले. बांधकाम केले त्यावर वॉर्डातील नागरिकांचा रोष नाही, मात्र मी निधी आणला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे काम होईल, कोणाला बोलण्याचा अधिकार नाही असे शब्द योग्य वाटत नाही. त्यामुळे शेवटी नाली बांधकाम बंद पडले. तात्पर्य हेच की, सत्ता हातात आहे म्हणून स्वत:चे हित जोपासून कामे करण्याऐवजी लोकांच्या फायद्याला प्राधान्य द्यावे.