शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

समाजकारणावरही भर द्या

By admin | Updated: March 4, 2016 01:52 IST

मी राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त विश्वास ठेवते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंदिया व भंडारा...

पूर्णा पटेल यांचे आवाहन : पक्ष बळकटीकरणावर जोरगोंदिया : मी राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त विश्वास ठेवते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात राजकारणासोबत समाजकारणाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या पूर्णा पटेल यांनी केले.शहर राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पक्षाच्या इतर घटकांमधील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्णा पटेल मार्गदर्शन करीत होत्या. आ.राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पटेल यांच्या रामनगर बगिचा या बंगल्यात गुरूवारी बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी मार्गदर्शन करताना पूर्णा पटेल म्हणाल्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षासाठी काम केले पाहीजे. राजकारण महत्वाचे आहेच, पण त्यासोबत समाजाशी जुळून राहण्यासाठी समाजकारणही केले पाहीजे. या निमित्ताने सामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. आज युवा शक्ती ही समाजाची ताकद आहे. त्या शक्तीला नवी दिशा देऊन योग्य प्रवाहात जोडण्याची आवश्यकता आहे. खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात युवा वर्गाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी नवीन दिशा देण्याचे कार्य आपण करू, असे आवाहन त्यांनी केले.निवडणुकीच्या काळात जे युवा कार्यकर्ते आपल्यासोबत जुळले होते ते आजही आपल्या सोबत आहेत हे पाहून आनंद होतो. त्यांच्या माझ्यावर जो विश्वास होता तो कायम असल्याचे यातून दिसून येते. आपले नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनातच आपल्याला काम करायचे असल्याचे पूर्णा पटेल म्हणाल्या.आ.राजेंद्र जैन म्हणाले, विद्यमान सरकार केवळ घोषणा करीत असून शेतकरी आणि युवा वर्गासाठी काहीच करीत नसल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषीमालाला योग्य भाव नसल्यामुळे हताश होऊन शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात पुढे येऊन सरकारवर दबाव बनविण्यासोबतच नागरिकांना जागरूक करण्याचे काम करावे, असे आवाहन आ.जैन यांनी केले.जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुका पर्यवेक्षक अशोक गुप्ता, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर आदींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे यांनी तर आभार शहर विद्यार्थी अध्यक्ष करण गील यांनी मानले. यावेळी गंगाधर परशुरामकर, अशोक सहारे, सुरज गुप्ता, निखील जैन, शहर युवक अध्यक्ष प्रतिक भालेराव, विनायक शर्मा, सुशिला भालेराव, सतीश देशमुख, रवी मुंदडा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)नवीन बुथ कमिटींचे गठन करायावेळी आ.राजेंद्र जैन यांनी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक शक्तीशाली बनविण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन बुथ कमिट्यांचे गठन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याचे सूचविले.सामाजिक कार्यासाठी इतर संस्थांचीही मदतपक्षाचे कोणतेही काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावानेच होईल. मात्र सामाजिक क्षेत्रातील अनेक कामे मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. देशात सामाजिक कार्य करणाऱ्या इतर संस्थांच्या माध्यमातूनही येणाऱ्या दिवसात गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक योजना कार्यान्वित केल्या जातील, असे पूर्णा पटेल म्हणाल्या.