शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ अडीच टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:35 IST

नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्दे जिल्हा बँकेची आघाडी कायम२७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पीक कर्ज वाटपाप्रती राष्ट्रीयकृत बँका उदासीन असल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सुध्दा बसला. बऱ्याच शेतकऱ्यांना वेळीच शेतमालाची विक्री न करता आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि फळबागधारक शेतकऱ्यांची स्थिती फार बिकट झाली. शेतात उत्पादित केलेला शेतमाल शेतात सडल्याने त्यांनी केलेला लागवड खर्चसुध्दा भरुन निघालेला नाही. अशात आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीची मशागत व खते आणि बियाणांची जुळवाजुळव करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी त्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यंदा नाबार्डने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाना खरीपासाठी एकूण २७० कोटी तर रब्बी हंगामाकरीता ३० कोटी असे एकूण ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून आत्तापर्यंत १९.८९ टक्के पीक कजार्चे १० हजार ४३ शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. यात सर्वाधिक ४६ कोटी ७० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ३२७ शेतकऱ्यांना २ कोटी ६२ लाख रुपये आणि ग्रामीण बँकानी ६०९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. खरीप हंगाम महिनाभर असून राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज वाटपाची गती पाहता बरेच शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रीयकृत बँकाची प्रक्रिया किचकटजिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बँकेतून पीक कर्ज उचलण्याची प्रक्रिया ही किचकट आहे. त्यामुळे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकामधून पीक कजार्ची उचल करण्यास उत्सुक नसतात. हे देखील पीक कर्जाचे वाटप कमी होण्यामागील कारण आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी