शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ अडीच टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:35 IST

नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्दे जिल्हा बँकेची आघाडी कायम२७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पीक कर्ज वाटपाप्रती राष्ट्रीयकृत बँका उदासीन असल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सुध्दा बसला. बऱ्याच शेतकऱ्यांना वेळीच शेतमालाची विक्री न करता आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि फळबागधारक शेतकऱ्यांची स्थिती फार बिकट झाली. शेतात उत्पादित केलेला शेतमाल शेतात सडल्याने त्यांनी केलेला लागवड खर्चसुध्दा भरुन निघालेला नाही. अशात आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीची मशागत व खते आणि बियाणांची जुळवाजुळव करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी त्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यंदा नाबार्डने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाना खरीपासाठी एकूण २७० कोटी तर रब्बी हंगामाकरीता ३० कोटी असे एकूण ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून आत्तापर्यंत १९.८९ टक्के पीक कजार्चे १० हजार ४३ शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. यात सर्वाधिक ४६ कोटी ७० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ३२७ शेतकऱ्यांना २ कोटी ६२ लाख रुपये आणि ग्रामीण बँकानी ६०९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. खरीप हंगाम महिनाभर असून राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज वाटपाची गती पाहता बरेच शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रीयकृत बँकाची प्रक्रिया किचकटजिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बँकेतून पीक कर्ज उचलण्याची प्रक्रिया ही किचकट आहे. त्यामुळे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकामधून पीक कजार्ची उचल करण्यास उत्सुक नसतात. हे देखील पीक कर्जाचे वाटप कमी होण्यामागील कारण आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी