शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ अडीच टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:35 IST

नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्दे जिल्हा बँकेची आघाडी कायम२७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नाबार्ड आणि शासनाच्या निदेर्शानुसार एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक असून जिल्हा बँकेने ३४ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकानी केवळ २.४९ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पीक कर्ज वाटपाप्रती राष्ट्रीयकृत बँका उदासीन असल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना सुध्दा बसला. बऱ्याच शेतकऱ्यांना वेळीच शेतमालाची विक्री न करता आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि फळबागधारक शेतकऱ्यांची स्थिती फार बिकट झाली. शेतात उत्पादित केलेला शेतमाल शेतात सडल्याने त्यांनी केलेला लागवड खर्चसुध्दा भरुन निघालेला नाही. अशात आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीची मशागत व खते आणि बियाणांची जुळवाजुळव करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी त्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. यंदा नाबार्डने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकाना खरीपासाठी एकूण २७० कोटी तर रब्बी हंगामाकरीता ३० कोटी असे एकूण ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून आत्तापर्यंत १९.८९ टक्के पीक कजार्चे १० हजार ४३ शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. यात सर्वाधिक ४६ कोटी ७० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ३२७ शेतकऱ्यांना २ कोटी ६२ लाख रुपये आणि ग्रामीण बँकानी ६०९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३८ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. खरीप हंगाम महिनाभर असून राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्ज वाटपाची गती पाहता बरेच शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रीयकृत बँकाची प्रक्रिया किचकटजिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयकृत बँकेतून पीक कर्ज उचलण्याची प्रक्रिया ही किचकट आहे. त्यामुळे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकामधून पीक कजार्ची उचल करण्यास उत्सुक नसतात. हे देखील पीक कर्जाचे वाटप कमी होण्यामागील कारण आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी