शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

पंचसूत्रीतून साधणार गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, बदलेल चित्र - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 12:13 IST

सर्वसामान्यांची पायपीट करणार कमी

गोंदिया : कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा तेथील मूलभूत पायाभूत सुविधांच्या आधारावर होत असतो. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, सिंचन, रोजगार आणि कृषी या पाचही घटकांतील सर्व समस्या दूर करून जिल्ह्याला सर्वच बाबतीत सक्षम करणार, याच पाच गोष्टीला सर्वात प्रथम आपले प्राधान्य असणार असून, ही जिल्ह्याच्या विकासाची पंचसूत्री असणार असल्याचे राज्याचे वनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला सुनील मेंढे, अशोक मेंढे, आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके व अधिकारी उपस्थित होते. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले गोंदिया जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा सर्वंकष तयार व्हावा, यातून जिल्ह्याचे भविष्याचे चित्र स्पष्ट व्हावे अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यात सर्वच पक्षाच्या आमदारांचे प्रश्न आणि त्यांचे मत ग्राह्य धरून ते तयार केले जाईल. १४ ऑक्टोबरपर्यंत हा सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असून, त्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात केली जाईल. प्रशासन हे लोकाभिमुख करण्यावर भर असेल. सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी एक विशेष ॲप कार्यक्रम तयार करून मोबाइलवर या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे सांगितले.

धानाला बोनस मिळणारच

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा ही सरकारचीसुद्धा भूमिका आहे. याचा लाभ शेतकऱ्यालाच मिळावा, यातील गैरव्यवहार दूर व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित बोनस मिळेल अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली.

नुकसानभरपाई देण्यास विलंब झाल्यास व्याज देणार

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ३० दिवसांच्या आत नुकसानभरपाई् दिली जावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना व्याजासह रक्कम देण्याची तरतूद केली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पांगोली नदीचे पुनरुज्जीवन करणार

गोंदिया शहरालगत वाहणाऱ्या पांगोली नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा मुद्दा खा. सुनील मेंढे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. त्याला मंजुरी दिली असून, पांगोली नदीचे पुनरुज्जीवन केले जाईल. यासाठी निधीची कमतरता पडून देणार नाही, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली.

नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे आदेश

भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये धुमाकूळ घातलेल्या सिटी-१ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहे. तसेच जंगलावर असणारे लोकांचे अवलंब कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी तेंदुपत्ता संकलन करणाऱ्याची बोनसची रक्कम ७२ कोटी रुपयांनी वाढविली असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारgondiya-acगोंदिया