शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उकाड्याने सर्व हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:17 IST

जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासीयांत घबराट निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा ४७.५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानातही गेला असून सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देमे १९९८ मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद : वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासीयांत घबराट निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा ४७.५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानातही गेला असून सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घेण्यात आली आहे. त्यात यंदा एप्रिल महिना ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने येत्या दोन महिन्यांत तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उकाड्यामुळे मात्र सर्वांच्या जीव कासावीस झाला असून कधी या उकाड्यापासून सुटका केव्हा मिळते याची सर्वच वाट बघत आहेत.निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र वाढते सिमेंटचे जंगल आणि वृक्षांचे कमी होत चाललेले प्रमाण हे तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ऋतूचक्र व निसर्गावर सुध्दा याचा परिणाम होत आहे. पावसाळ््यात पाऊस पडत नसून उन्हाळ््यात रविराज सीमा तोडून आग ओकू लागले आहे. पर्यावरणाशी माणूस जो खेळ खेळत आहे त्याची प्रतीपूर्ती निसर्गाकडून केली जात आहे.उन्हाळ््यात कधी मे महिना तापत असताना आता मात्र मार्च महिन्यापासून सूर्यदेव आग ओकत आहेत.यंदाचीच स्थिती बघितल्यास एप्रिल महिन्यानेच सर्वांना होरपळून काढले आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. यावरून मे महिन्यात पडणारी उन्ह आता त्यापूर्वीच पडू लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सध्यातरी ४३.८ अंश सेल्सिअस सर्वाधीक तापमान असले तरी मे आणि जून महिना शिल्लक आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील मागील २० वर्षांतील तापमानाचा अभ्यास केल्यास सन १९९८ मध्ये मे महिन्यात जिल्ह्यात ४७.५ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. तर सन २००३ मधील जून महिन्यातही ४७.५ एवढीच नोंद घेण्यात आली आहे. यावरून सध्या तरी तेवढा उन्हाळा पडत नसल्याचे दिसते. मात्र एप्रिल महिन्यातील स्थिती बघता मे आणि जून महिना धोक्याचा दिसून येत आहे.विदर्भात रेड अलर्टविदर्भातील तापमानात सातत्याने होत असलेली वाढ पाहता विदर्भात रेड अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. त्यातही गोंदिया जिल्हाचे तापमान ४७.८ अंश सेल्सिअस पर्यंत गेला असल्याने यंदाही एवढे तापमान गाठण्याची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे विदर्भातील तापमानातील वाढ बघता हवामान खात्याने विदर्भात रेड अलर्ट घोषीत केला आहे. वाढते तापमान बघता हवामान खात्याने दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हात बाहेर पडू नये असे आवाहनही सुरक्षेच्या दृष्टीने केले आहे.

टॅग्स :weatherहवामान