शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पर्यायी वनीकरणात अवैध सागवान कटाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:06 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील पर्यायी वनीकरणातून मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या परिसरात सागवान तस्कर सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देवनविभाग सुस्त : सागवान तस्करीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील पर्यायी वनीकरणातून मोठ्या प्रमाणात अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या परिसरात सागवान तस्कर सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्ष संवर्धन केल्या जात आहे. ग्रामीण भागात अवैध वृक्ष तोडीला कायमचा आळा बसावा म्हणून वन विभागाच्या वतीने गाव पातळीवरील संयुक्त वनव्यवस्थापन समितीतर्फे गॅस कनेक्शनचे वाटप केले जात आहे. मात्र याकडे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोडीला वाव मिळत असल्याचे चित्र आहे. खांबी येथील पर्यायी वनीकरणातून अवैध सागवान वृक्षांची कटाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यानंतरही क्षेत्र सहाय्यक व बीटरक्षक असे काही घडलेच नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. वन विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे अवैध सागवान कटाई करणारे बिनधास्तपणे वावरत आहेत.क्षेत्र सहायक बोंडगावदेवी कार्यालयामार्फत येणाºया खांबी-पिंपळगाव येथे फुटाळा प्रकल्पांतर्गत पर्यायी वनीकरण २००२ मध्ये २८ हजार ६२५ सागवान रोपांची लागवड करण्यात आली. वनीकरणातील रोपांची देखभाल करण्यासाठी संयुक्त ग्राम वन व्यवस्थापन समितीच्या वतीने एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्षेत्रातील वनकर्मचारी वन समितीला सहकार्य करीत नसल्याचे गावकऱ्यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. पर्यायी वनीकरणातील सागवान झाडांची जोपासना करण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आहे. मात्र वनकर्मचारी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाही अशी गावकऱ्यांची ओरड आहे. मागील काही दिवसांपूर्वी या परिसरातील ९ सागवानाची झाडे आरीने कापून नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा गुरूवारी (दि.१०) मोठ्या आकाराची सागवानाची तीन झाडे कटाई करुन नेल्याची घटना उघडकीस आली. शासनस्तरावर वृक्ष वाढीसाठी प्रयत्न होत असताना खांबी येथील पर्यायी वनीकरणातून सर्रासपणे सागवानाची अवैध कटाई केली जात आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने वारंवार सागवानाची अवैध कटाई करण्याच्या घटना घडत असल्याचे बोलल्या जाते. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याप्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.वनमंत्र्याकडे करणार तक्रारखांबी परिसरातील पर्यायी वनीकरणाच्या परिसरात सागवान वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. वांरवार हा प्रकार घडत असताना याकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने वन संपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.मोहिमेला हरताळपर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्यासाठी राज्य शासन शतकोटी वृक्ष लागवडी सारख्या योजना राबवित आहे. जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या कर्मचाºयांचे वनांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाच्या मोहीमेला या विभागाचे कर्मचारी हरताळ फासत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग