शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेतच झाला अनिलचा घात

By admin | Updated: March 13, 2015 01:56 IST

वर्षभरापूर्वीच त्याचा पत्नीशी काडीमोड झाला होता. मुलबाळही नव्हते. कदाचित याच वैफल्यातून तो दारूच्या आहारी गेला.

मनोज ताजने गोंदियावर्षभरापूर्वीच त्याचा पत्नीशी काडीमोड झाला होता. मुलबाळही नव्हते. कदाचित याच वैफल्यातून तो दारूच्या आहारी गेला. मंगेझरीत टेलर म्हणून वावरत असताना सर्वांशीच त्याचे चांगले संबंध होते. मात्र तो जादूटोणा करीत असल्याचा संशय घेऊन त्याची गावकऱ्यांनी हत्या केल्यानंतरही अनिलबद्दल गावात फारशी हळहळ का व्यक्त होत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. वरकरणी पाहता अनिलचे दारूच्या आहारी जाण्यामुळेच तो सख्ख्या बहिणीपासून आणि जावयापासून दुरावल्या गेला असल्याचे दिसून येते. यामुळेच अनिलच्या चितेची राख सावडण्यासाठीही कोणी समोर आलेले नाही.धुळवडीच्या दिवशी (दि.६) नागझिरा अभयारण्याच्या तोंडाशी असलेल्या मंगेझरी या गावात अनिल हळदे या ४५ वर्षीय इसमाची गावातील लोकांनी बेदम मारहाण करून हत्या केली. अनिल गावात जादूटोणा करीत असल्याचा संशय गावकऱ्यांना असल्यामुळे त्याला संपविल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यामागे अजूनही काही कारणे आहेत का याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.अनिल हा वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या तळेगाव (श्यामजीपंत) येथील रहिवासी होता. १५ वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले. पण त्याला मुलबाळ काहीच नव्हते. गावात तो टेलरिंगचे काम करून जेमतेम कमवित होता. घरी वृद्ध आणि पत्नी असे त्याचे छोटे कुटुंब होते. मात्र दारूचे व्यसन जडल्यामुळे त्याचे पत्नीसोबतही पटत नव्हते. यातूनच एक वर्षापूर्वी त्याचा पत्नीशी काडीमोड झाला. आपला भाऊ सुधारला पाहीजे म्हणून मंगेझरी येथील इंदिरा पांझारे यांनी त्याला आपल्या गावात येऊन टेलरिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. गावात चिकन भोजनालय चालविणारे बहिण इंदिरा व जावई रतीराम पंधरे यांनी काही अंतरावर असलेल्या आपल्या जुन्या घरात अनिलची राहण्याची व्यवस्था केली. त्याच घरातील समोरच्या खोलीत त्याने टेलरिंगचे दुकान थाटले. त्याच्या दारूड्या स्वभावामुळे जावयांनी त्याला स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून खाण्याचा सल्ला दिला होता.ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मृत अनिलची राख अजूनही तिथेच पडून आहे. त्यातील काही अस्थी पोलिसांनी जप्त करून रासायनिक परीक्षणासाठी पाठविल्या आहेत. पण उर्वरित राख सावडून तिचे विधीवत विसर्जन करण्यासाठीही कोणी नातेवाईक पुढे आलेले नाही, ही बाब बरेच काही सांगून जाते.महिनाभरात शिजला कट?अनिल टेलरिंगचे काम करीत असला तरी गेल्या ५ फेब्रुवारीला तो जावयांकडील ओळखीच्या लोकांसोबत भुसावळ येथे बांधकामाच्या कामावर गेला होता. ५ मार्चला तो तिरोड्यात आणि ६ ला धुळवडीच्या दिवशी मंगेझरीत पोहोचला. पण ज्या पद्धतीने त्याला सर्वांनी मिळून मारून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून त्याला मारण्याचा कट तो गावात नसतानाच्या एक महिन्याच्या कालावधीतच शिजला असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तो गावात येण्याची वाट असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच दिवशी त्याला गाठले आणि दारूच्या नशेतच त्याला कायमचे संपविले.