शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

विमान प्राधिकरणातर्फे जमिनीचा ताबा घेण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:23 IST

तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोध : योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. यामुळे गुरूवारी (दि.२०) या ठिकाणी थोडा तणाव निर्माण झाला होता.बिरसी विमानतळ प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत कामठा-परसवाडा या मार्गाला लागून असलेली ४१ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. या वेळी बुलडोजर लावून जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान या वेळी काही शेतकऱ्यांनी याला विरोध केला. प्राधिकरणाकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसून या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतरच जमिनीचा ताबा घेण्यात यावा अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी आपल्याला अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसून बळजबरीने जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. विमानतळ प्राधिकरणाने नियमानुसार ही जमीन प्राधिकरणाच्या नावे झाली असून भूसंपादन अधिनियमानुसार जमिन ताब्यात घेतली जात असल्याचे सांगितले.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा. त्यानंतरच जमीन ताब्यात घेण्यात यावी.- मनोज दहीकर, शेतकरी व कृउबास संचालक...................................बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. मात्र काही शेतकरी या विरोधात न्यायालयात गेले आहे. पण सदर जमीन ही प्राधिकरणाच्या नावावर झाली असून भुसंपादन अधिनियमानुसारच ती आता ताब्यात घेतली जात आहे. यात कुठल्याची नियमाचे उल्लघंन करण्यात आले नाही.- सचिन खंगार, संचालक बिरसी विमानतळ.

टॅग्स :AirportविमानतळFarmerशेतकरी