शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विमान प्राधिकरणातर्फे जमिनीचा ताबा घेण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:23 IST

तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोध : योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. यामुळे गुरूवारी (दि.२०) या ठिकाणी थोडा तणाव निर्माण झाला होता.बिरसी विमानतळ प्रशासनाच्या वतीने पोलीस कर्मचाºयांच्या उपस्थितीत कामठा-परसवाडा या मार्गाला लागून असलेली ४१ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. या वेळी बुलडोजर लावून जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान या वेळी काही शेतकऱ्यांनी याला विरोध केला. प्राधिकरणाकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसून या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतरच जमिनीचा ताबा घेण्यात यावा अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी आपल्याला अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नसून बळजबरीने जमिनी ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. विमानतळ प्राधिकरणाने नियमानुसार ही जमीन प्राधिकरणाच्या नावे झाली असून भूसंपादन अधिनियमानुसार जमिन ताब्यात घेतली जात असल्याचे सांगितले.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा. त्यानंतरच जमीन ताब्यात घेण्यात यावी.- मनोज दहीकर, शेतकरी व कृउबास संचालक...................................बिरसी विमानतळ प्राधिकरणाने शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. मात्र काही शेतकरी या विरोधात न्यायालयात गेले आहे. पण सदर जमीन ही प्राधिकरणाच्या नावावर झाली असून भुसंपादन अधिनियमानुसारच ती आता ताब्यात घेतली जात आहे. यात कुठल्याची नियमाचे उल्लघंन करण्यात आले नाही.- सचिन खंगार, संचालक बिरसी विमानतळ.

टॅग्स :AirportविमानतळFarmerशेतकरी