शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:07 IST

जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : जोपर्यंत शेतकरी पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही. नेमका हाच धागा पकडून तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता, कमी पर्जन्याचा शेतीवर अनुकुल परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांरपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न कृषी विभागातर्फे केला जात आहे. यात तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.तालुक्यात पट्टा व श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. तालुक्यातील रेखा टेंभरे, दारकन बिसेन, ममता हटवार या महिला शेतकऱ्यांच्या बांधावर श्रमदान व रोवण्या करण्यात आल्या. जलयुक्त शिवार अभियान, उन्नत शेती समृद्ध शेतकरी यासारख्या अभियानाला जोड देत हायटेक शेती कशी करावी, याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन करीत आहे.लोकसहभागातून झाली कामेतिरोडा तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियान सन २०१६-१७ मध्ये ग्रामपंचायत यंत्रने मार्फत मामा तलाव गाळ काढणे, नाल्यातील गाळाचा उपसा केल्याने पाणी साठ्यात वाढ करणे शक्य झाले. यामुळे भूजल पातळीत सु्द्धा वाढ झाली. निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या शेतात नेवून टाकला. त्यामुळे शेतीची सुपिकता वाढविण्यास मदत झाली.शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठविण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिन विकास शक्य आहे.-मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी, तिरोडा

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती