शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

कृषी पर्यटन दृष्टिपथास

By admin | Updated: July 1, 2014 01:31 IST

पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून

निधीचा अभाव : कारंजात १६ एकरात साकारणार पर्यटनाची योजनानरेश रहिले - गोंदियापूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून सहज विकास साधता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांपुढे कृषी पर्यटनाचा पर्याय ठेवला जात आहे. गोंदिया शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३५ एकर जागेपैकी १६ एकर जागेत कृषी पर्यटन प्रकल्प राबविण्याची संकल्पना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मांडली. एवढेच नाही तर ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.या कृषी पर्यटनासाठी १६ एकर जागेत बागायती फळ लागवड करुन ती पिके पाहण्यासाठी किंवा सकाळ संध्याकाळ या परिसरात इच्छुकांना भ्रमंती करण्यासाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल पंप हाऊस बसविण्यात आले आहे. त्या पंप हाऊसला तीन जलस्त्रोताने जोडण्यात आले आहे. दोन बोअरवेल व एक विहिरील पाणी या सेंट्रल पंप हाऊसमध्ये आणले जाईल. दीड लाख लिटर पाण्याचा साठा राहील. एवढे पंपहाऊस उभारण्यात आले आहे. खत व पाणी ड्रिपलाईनने फळबागांना देण्यात येणार आहे.या फार्ममध्ये फेरफटका मारण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या १६ एकरात डाळींबं, सीताफळ, पेरू, आंबा याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक गोष्टी स्वयंचलित यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. याशिवाय या फळबागांना सतत पाणी मिळावे यासाठी पावणे दोन कोटी लिटर क्षमतेचा तलाव पाणीसाठा करून ठेवण्यासाठी उभारण्यात आला आहे. या तलावात बाहेरचे मासे बोलावून छंद म्हणून पर्यटकांना मासेमारी करण्याची परवानगी कृषी विभाग देणार आहे. या तलावासाठी नियमित निधीतून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याच्या कृषी व्यवस्थापनाकरिता आलेल्या ४० लाखांच्या निधीपैकी काही निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला आहे. या कृषी पर्यटनात तीन किलोमिटरचा रस्ता तयार होणार असून गिट्टी व मुरूम टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. कृषी पर्यटनासाठी शासनाकडून दुसरे स्वतंत्र अनुदान नसले तरी कृषी विभागाला असलेल्या नियमित निधीतूनच कृषी पर्यटनाची संकल्पना साकारणार असल्याची माहिती अशोक कुरील यांनी दिली. याठिकाणी पिक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी जिल्ह्यातील कृषीसंबंधी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. याठिकाणी हवेतून व सौरऊर्जेतून एक किलो वॅट विजनिर्मिती करण्यात येणार आहे. ही वीज तेथील उपकरणे व कार्यालयातील कामासाठी वापरण्यात येणार आहे.