शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पर्यटन दृष्टिपथास

By admin | Updated: July 1, 2014 01:31 IST

पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून

निधीचा अभाव : कारंजात १६ एकरात साकारणार पर्यटनाची योजनानरेश रहिले - गोंदियापूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून सहज विकास साधता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांपुढे कृषी पर्यटनाचा पर्याय ठेवला जात आहे. गोंदिया शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३५ एकर जागेपैकी १६ एकर जागेत कृषी पर्यटन प्रकल्प राबविण्याची संकल्पना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मांडली. एवढेच नाही तर ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.या कृषी पर्यटनासाठी १६ एकर जागेत बागायती फळ लागवड करुन ती पिके पाहण्यासाठी किंवा सकाळ संध्याकाळ या परिसरात इच्छुकांना भ्रमंती करण्यासाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल पंप हाऊस बसविण्यात आले आहे. त्या पंप हाऊसला तीन जलस्त्रोताने जोडण्यात आले आहे. दोन बोअरवेल व एक विहिरील पाणी या सेंट्रल पंप हाऊसमध्ये आणले जाईल. दीड लाख लिटर पाण्याचा साठा राहील. एवढे पंपहाऊस उभारण्यात आले आहे. खत व पाणी ड्रिपलाईनने फळबागांना देण्यात येणार आहे.या फार्ममध्ये फेरफटका मारण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या १६ एकरात डाळींबं, सीताफळ, पेरू, आंबा याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक गोष्टी स्वयंचलित यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. याशिवाय या फळबागांना सतत पाणी मिळावे यासाठी पावणे दोन कोटी लिटर क्षमतेचा तलाव पाणीसाठा करून ठेवण्यासाठी उभारण्यात आला आहे. या तलावात बाहेरचे मासे बोलावून छंद म्हणून पर्यटकांना मासेमारी करण्याची परवानगी कृषी विभाग देणार आहे. या तलावासाठी नियमित निधीतून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याच्या कृषी व्यवस्थापनाकरिता आलेल्या ४० लाखांच्या निधीपैकी काही निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला आहे. या कृषी पर्यटनात तीन किलोमिटरचा रस्ता तयार होणार असून गिट्टी व मुरूम टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. कृषी पर्यटनासाठी शासनाकडून दुसरे स्वतंत्र अनुदान नसले तरी कृषी विभागाला असलेल्या नियमित निधीतूनच कृषी पर्यटनाची संकल्पना साकारणार असल्याची माहिती अशोक कुरील यांनी दिली. याठिकाणी पिक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी जिल्ह्यातील कृषीसंबंधी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. याठिकाणी हवेतून व सौरऊर्जेतून एक किलो वॅट विजनिर्मिती करण्यात येणार आहे. ही वीज तेथील उपकरणे व कार्यालयातील कामासाठी वापरण्यात येणार आहे.