शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कृषी पर्यटन दृष्टिपथास

By admin | Updated: July 1, 2014 01:31 IST

पूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून

निधीचा अभाव : कारंजात १६ एकरात साकारणार पर्यटनाची योजनानरेश रहिले - गोंदियापूर्व विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही परंपरागत शेतीतच गुरफटलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर निव्वळ धानाच्या उत्पादनावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीतून सहज विकास साधता यावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांपुढे कृषी पर्यटनाचा पर्याय ठेवला जात आहे. गोंदिया शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३५ एकर जागेपैकी १६ एकर जागेत कृषी पर्यटन प्रकल्प राबविण्याची संकल्पना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मांडली. एवढेच नाही तर ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.या कृषी पर्यटनासाठी १६ एकर जागेत बागायती फळ लागवड करुन ती पिके पाहण्यासाठी किंवा सकाळ संध्याकाळ या परिसरात इच्छुकांना भ्रमंती करण्यासाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल पंप हाऊस बसविण्यात आले आहे. त्या पंप हाऊसला तीन जलस्त्रोताने जोडण्यात आले आहे. दोन बोअरवेल व एक विहिरील पाणी या सेंट्रल पंप हाऊसमध्ये आणले जाईल. दीड लाख लिटर पाण्याचा साठा राहील. एवढे पंपहाऊस उभारण्यात आले आहे. खत व पाणी ड्रिपलाईनने फळबागांना देण्यात येणार आहे.या फार्ममध्ये फेरफटका मारण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या १६ एकरात डाळींबं, सीताफळ, पेरू, आंबा याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. यासाठी अनेक गोष्टी स्वयंचलित यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. याशिवाय या फळबागांना सतत पाणी मिळावे यासाठी पावणे दोन कोटी लिटर क्षमतेचा तलाव पाणीसाठा करून ठेवण्यासाठी उभारण्यात आला आहे. या तलावात बाहेरचे मासे बोलावून छंद म्हणून पर्यटकांना मासेमारी करण्याची परवानगी कृषी विभाग देणार आहे. या तलावासाठी नियमित निधीतून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याच्या कृषी व्यवस्थापनाकरिता आलेल्या ४० लाखांच्या निधीपैकी काही निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला आहे. या कृषी पर्यटनात तीन किलोमिटरचा रस्ता तयार होणार असून गिट्टी व मुरूम टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. कृषी पर्यटनासाठी शासनाकडून दुसरे स्वतंत्र अनुदान नसले तरी कृषी विभागाला असलेल्या नियमित निधीतूनच कृषी पर्यटनाची संकल्पना साकारणार असल्याची माहिती अशोक कुरील यांनी दिली. याठिकाणी पिक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी जिल्ह्यातील कृषीसंबंधी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. याठिकाणी हवेतून व सौरऊर्जेतून एक किलो वॅट विजनिर्मिती करण्यात येणार आहे. ही वीज तेथील उपकरणे व कार्यालयातील कामासाठी वापरण्यात येणार आहे.