शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वन पर्यटनासोबत कृषी पर्यटनही शक्य अनेकांना आशा

By admin | Updated: May 8, 2014 23:49 IST

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात.

नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे बदलू शकते जिल्हावासीयांचे जीवनमान

मनोज ताजने - गोंदिया

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात. मात्र वनपर्यटनासोबतच या भागात कृषी पर्यटनाला चालना दिल्यास पर्यटकांसाठी हे वेगळे आकर्षण राहणार आहे. यातूनच जिल्ह्यात रोजगाराची नवी दालनं उघडल्या जाऊन स्वयंरोजगाराला चालना मिळू शकते, असा दावा अनेक जाणकार करीत आहेत. नवेगावबांध येथे पर्यटन विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर लोकमतने चार भागांची मालिका प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’ला फोन करून या विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद दिले.

आतातरी जिल्हा पर्यटन समितीची या बाबतीत असलेली उदासीनता दूर होऊन येथील अर्धवट असलेल्या कामांना चालना मिळेल अशी आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. सोबतच या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी कसा वाव आहे, हेसुद्धा त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. नवेगावबांध पर्यटनस्थळाचा इतिहास फार जुना आहे. परंतु या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. परिणामी येथे मधल्या काळात वाढलेली पर्यटकांची संख्या आता रोडावली आहे. दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी मिळविला. यातील ९ कोटी रुपये नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या विकासासाठी लावले जाणार आहेत.

मात्र त्या कामांनाही अजून सुरूवात झालेली नाही. त्या निधीतून म्युझियम, लेझर शो, इको फ्रेंडली विश्रामगृह आदी सुविधा उभारल्या जाणार असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले आहे. मात्र त्यासोबतच आता कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज अनेकांना वाटत आहे. शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आणि विशेषत: मुलांना शेती कशी पिकते यासह भाताची शेती कशी असते हेसुद्धा माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यादृष्टीने विचार करून पावले उचलली तर या भागातील रोजगाराच्या संधी आणखी वाढून या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.