शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

वन पर्यटनासोबत कृषी पर्यटनही शक्य अनेकांना आशा

By admin | Updated: May 8, 2014 23:49 IST

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात.

नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे बदलू शकते जिल्हावासीयांचे जीवनमान

मनोज ताजने - गोंदिया

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात. मात्र वनपर्यटनासोबतच या भागात कृषी पर्यटनाला चालना दिल्यास पर्यटकांसाठी हे वेगळे आकर्षण राहणार आहे. यातूनच जिल्ह्यात रोजगाराची नवी दालनं उघडल्या जाऊन स्वयंरोजगाराला चालना मिळू शकते, असा दावा अनेक जाणकार करीत आहेत. नवेगावबांध येथे पर्यटन विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर लोकमतने चार भागांची मालिका प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’ला फोन करून या विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद दिले.

आतातरी जिल्हा पर्यटन समितीची या बाबतीत असलेली उदासीनता दूर होऊन येथील अर्धवट असलेल्या कामांना चालना मिळेल अशी आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. सोबतच या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी कसा वाव आहे, हेसुद्धा त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. नवेगावबांध पर्यटनस्थळाचा इतिहास फार जुना आहे. परंतु या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. परिणामी येथे मधल्या काळात वाढलेली पर्यटकांची संख्या आता रोडावली आहे. दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी मिळविला. यातील ९ कोटी रुपये नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या विकासासाठी लावले जाणार आहेत.

मात्र त्या कामांनाही अजून सुरूवात झालेली नाही. त्या निधीतून म्युझियम, लेझर शो, इको फ्रेंडली विश्रामगृह आदी सुविधा उभारल्या जाणार असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले आहे. मात्र त्यासोबतच आता कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज अनेकांना वाटत आहे. शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आणि विशेषत: मुलांना शेती कशी पिकते यासह भाताची शेती कशी असते हेसुद्धा माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यादृष्टीने विचार करून पावले उचलली तर या भागातील रोजगाराच्या संधी आणखी वाढून या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.