शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

शेतीशास्त्र सर्व शास्त्रांची जननी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 9:44 PM

शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : शेतकरी व क्षेत्रीय कर्मचारी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.शेतकरी व क्षेत्रिय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम देवरी येथील मंगल कार्यालयात शनिवारी घेण्यात आला. देवरी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सडक- अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा या ४ तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, शेतकरी मित्र व कर्मचारी, अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. माजी बालकल्याण सभापती सविता पुराम याच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, हिवरा कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विषतज्ज्ञ आर.डी. चव्हाण, धान संशोधन केंद्र साकोलीचे डॉ. जी.आर. शामकुवर, सालेकसाचे तालुका कृषी अधिकारी एस.व्ही.भोसले, मंडळ कृषी अधिकारी काशीनाथ मोहाळीकर, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी बाळासाहेब गिरी, तालुका कृषी अधिकारी लखन बन्सोड, डॉ. किशोर पात्रीकर, मंडळ अधिकारी चंद्रभान आकरे उपस्थित होते.डॉ.शामकुवर यांनी, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन खताची मात्रा द्यावी. ठोकळ धानापेक्षा बारीक धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्यास सांगितले. तोडसाम यांनी, कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना किडरोगाचा योग्य निदान लावूनच किटकनाशकाची मात्रा द्यावी, अवाजवी किटकनाशके देवू नये असे सांगितले.पुराम यांनी, कृषी मेळाव्यांमुळे कृषी केंद्र संचालकांना, शेतकऱ्यांना व कृषी मित्रांना किड व रोगाच्या व्यवस्थापनाची माहिती मिळाल्याने किड व रोगाचे नियंत्रण करण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सानिध्यात राहून किड व रोगाची माहिती जाणून घ्यावी. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे सांगितले.मेळाव्याला सडक-अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा येथील कृषी मित्र, कृषी सेवा केंद्र संचालक, महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. संचालन बन्सोड यांनी केले. आभार जी.जी. तोडसाम यांनी मानले.