शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

करंजी गावात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 22:04 IST

तालुक्यातील ग्राम करंजी येथे दोन दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देतीन गोठे व घर खाक : आगीचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील ग्राम करंजी येथे दोन दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.बुधवारी (दि.५) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहनलाल तावाडे व भरतराम तावाडे या भावंडांच्या घराला आग लागून संपूर्ण घर व गोठा जळून खाक झाला. यात बैलगाडी, नांगर, शेती उपयोगी साहित्य व जनावरांचा चारा जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (दि.६) सकाळी आत्माराम गायधने यांच्या घराला अचानक आग लागून त्यांचेही घर पूर्णत: जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील जीवनोपयोगी व शेती उपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले.तर दुपारी १२ वाजताच्या सुमारास उदाराम फुंडे यांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटना मानवी कृत्याने की शॉटसर्किटने घडल्या याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.नागरिकांमध्ये दहशतअचानक आग लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरातील साहित्य घराबाहेर काढले आहेत. अचानक लागणाऱ्या आगीला विझविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून गावात जागोजागी पाण्याचे ड्रम भरुन ठेवले जात आहेत.

टॅग्स :fireआग