शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मोरवाहीवासीयांनी आंदोलन घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलन दरम्यान दोषींवर दान दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने २ महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार बांधकामप्रकरणी मागील ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोरवाहीवासीयांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची  दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींवर कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर सोमवारी (दि.१) रात्री उशिरा आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा समितीतर्फे करण्यात आली. समितीने आंदोलन मागे  घेतल्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे.मोरवाही येथील विनापरवानगी बुद्धविहार तोडणाऱ्यांना तसेच मागील दोन वर्षांपासून बुद्ध विहारचे बांधकाम ताटकळत ठेवणाऱ्या दोषी सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कनिष्ठ उपअभियंता व बांधकाम कंत्राटदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मागील ऑगस्ट महिन्यात येथील बौद्ध समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलन दरम्यान दोषींवर दान दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जिल्हा प्रशासनाने २ महिने उलटूनही दोषी व्यक्तींची कोणतीही चौकशी केली नाही. अखेर मोरवाही येथील बौद्ध समाजबांधव तसेच आमगाव येथील बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर गुरुवारपासून (दि.२८) अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला बळ म्हणून येथील महिलांनी सोमवारी (दि.१) ) आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी महिलांच्या हातून ज्वलनशील पदार्थ हिसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे काहीकाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते.  तसेच लेखी आश्वासनानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनासाठी डी. एस. मेश्राम, संदीप मेश्राम, श्रेयस गोंडाने, मंगल गोंडाने, आनंद बन्सोड, उमाकांत भालेकर, पंचशीला मेश्राम, संगीता रामटेके, प्रमिला मेश्राम, शालिनी मेश्राम, सूर्यकांता वैद्य, सविता मेश्राम, सुनीता वैद्य, माधुरी मेश्राम, पंचशीला भालाधरे,   पोर्णिमा मेश्राम, तारा भीमटे, प्रतिमा सोनटक्के, कल्पना मेश्राम, पद्मा टेंभुर्णीकर, शालिनी आनंद मेश्राम आदीनी सहकार्य केले.

आठ दिवसात करणार कारवाई - चर्चेत जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, पोलीस निरीक्षक बोरसे, आंदोलकांतर्फे भारतीय बौद्ध महासभा आमगावचे अध्यक्ष भरत वाघमारे, सचिव योगेश रामटेके, समता बुद्ध विहार समितीचे दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, आशिष मेश्राम, अनिल रामटेके, चंद्रशेखर मेश्राम, राजकपूर मेश्राम, पूर्व सरपंच सुरेश कावळे, पोलीस पाटील विनोद ठाकूर सहभागी झाले होते. यात आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करीत या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी