शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तब्बल 70 वर्षांनंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला काम दिले आहे. रेल्वे विभाग आणि शासनाने दिलेल्या डेडलाईननुसार हा पूल सहा महिन्यांच्या कालावधीत पाडायचा होता. मात्र, यापैकी दोन महिन्यांचा कालावधी निघून गेल्याने आता चार महिन्यांतच पूल पाडण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. हा पूल पूर्णपणे पाडून झाल्यानंतर या ठिकाणी १२५ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावर १९५२ साली उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. मात्र, हा उड्डाणपूल जीर्ण झाला असून त्यावरून वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे ठरू शकते यासंबंधीचे पत्र रेल्वेने जिल्हा प्रशासनाने दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून (दि.५) हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद केला. हा जुना उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला देखील सुरुवात केली. तब्बल ७० वर्षांच्या कालावधीनंतर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला काम दिले आहे. रेल्वे विभाग आणि शासनाने दिलेल्या डेडलाईननुसार हा पूल सहा महिन्यांच्या कालावधीत पाडायचा होता. मात्र, यापैकी दोन महिन्यांचा कालावधी निघून गेल्याने आता चार महिन्यांतच पूल पाडण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे. हा पूल पूर्णपणे पाडून झाल्यानंतर या ठिकाणी १२५ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर झाला आहे. सुरुवातीला विश्रामगृहाच्या बाजूने पूल तोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. उड्डाणपुलाखालून रेल्वे ट्रॅक असल्याने त्यासाठी मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याने रेल्वेच्या तांत्रिक विभागाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला टीना ठोकून व जेसीबीने रस्ता खोदून पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. परिणामी, शहरवासीयांची तारांबळ उडाली होती. 

२० कुटुंबांचा रोजगार हिरावला - उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागेवर शहरातील २० नागरिकांनी छोटी छाेटी दुकाने सुरू केली होती. मागील ५० ते ६० वर्षांपासून यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आता पूल पाडण्यात येणार असल्याने त्यांनासुद्धा तिथून हटविण्यात आले. त्यामुळे त्यांचा रोजगार देखील हिरावला आहे. त्यामुळे या व्यावसायीकांना दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागत आहे. 

बांधण्यासाठी लागले ३५ कोटी, तोडायला लागणार ६ कोटी रुपये गोंदिया-बालाघाट मार्गावर १९५२ ला उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. तेव्हा या पुलाच्या बांधकामासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. आता तब्बल ७० वर्षांनंतर हा पूल तोडण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.  पूल तोडण्याचे कंत्राट मुंबई येथील मत्ते असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे कर्मचारी गुरुवारी गोंदिया दाखल झाले. 

 ७२ कुटुंब येणार उघड्यावर - जुन्या उड्डाणपुलाखाली मागील ५० ते ६० वर्षांपासून ७२ कुटुंब पक्के घरी बांधूृन वास्तव्यास आहेत. मात्र, अतिक्रमण करून राहत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ७२ कुटुंबांना नोटीस देऊन जागा खाली करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या कुटुंबांना निवाऱ्याविना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. पहिल्याच दिवशी वाहतुकीची कोंडी - जुना उड्डाणपूल गुरुवारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूकडील नागरिकांना शहरात येण्यासाठी अडचण निर्माण झाली. याला पर्याय म्हणून शहरातील अंडरग्राऊंड परिसरातील रस्त्याने सर्व वाहने वळविण्यात आली. मात्र, या परिसरातसुद्धा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. जुना जीर्ण, तर नवीन सदोष - जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे याला पर्याय म्हणून याच मार्गावर ८८ कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, या पुलाच्या दोन्ही बाजूला पादचारी पुलासाठी जागाच सोडण्यात आली नाही, तर या पुलाचा उतार देखील धोकादायक असल्याने यावर अपघाताची शक्यता अधिक आहे. पुलावरून पायी जाण्यासाठी जागा नसल्याने पादचारी नागरिक या नवीन उड्डाणपुलावरून जाणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी