शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अडीच लाख शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान’ चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:00 IST

महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा मागील आठवडाभरापासून केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला लागले आहे.

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा मागील आठवडाभरापासून केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला लागले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी असून यापैकी अडीच लाख शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपर्यंत शेती असल्याची बाब कृषी व महसूल विभागाने याद्यांची छाननी केल्यानंतर पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना २ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली. याचा लाभ शेतकºयांना तीन टप्प्यात दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी या योजनेतंर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यासाठीच मागील आठवडाभरापासून महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला युध्दपातळीवर कामाला लावण्यात आले आहे.यातंर्गत जिल्ह्यातील दोन्ही विभागाच्या यंत्रणांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम मंगळवारी (दि.१२) पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी आहेत.यापैकी अडीच लाख शेतकºयांकडे दोन हेक्टर शेती असल्याची बाब याद्यांच्या छाननीनंतर पुढे आली आहे. त्यामुळे ऐवढ्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.महसूल आणि कृषी विभागाने तयार केलेल्या याद्यांचे प्रत्येक गाव स्तरावर वाचन केले जाणार आहे. त्यानंतर कृषी सहाय्यक यादीनुसार संबंधित गावातील शेतकºयांच्या कुटुंबांना भेटी देऊन नावांची खातरजमा करणार आहेत. त्यानंतर ही यादी महाआॅनलाईनवर अपलोड करुन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शेतकºयांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.मर्यादा वाढल्यास संख्येत वाढप्रधानमंत्री किसास सन्मान योजनेचा लाभ केवळ २ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक क्षेत्र असणाºया शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांची ही नाराजी ओढावून घेणे विद्यमान सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारकडून हेक्टरच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.आठवडाभरात होणार चित्र स्पष्ट२ हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ऐवढ्या कमी कालावधीत याद्या तयार करण्याचे काम प्रथमच झाल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोललते आहे. याद्या तयार करुन त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी संलग्न करण्याचे काम सुध्दा येत्या आठवडाभरात पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता मार्च महिन्यात जमा होईल यात कुठलही शंका नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी