शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

उपोषणामुळे प्रशासन नरमले

By admin | Updated: March 12, 2016 01:59 IST

नवेगावबांध जलाशयाच्या पाणीचोरी प्रकरणी पाच गावांतील १३ शेतकऱ्यांनी ६ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

मागण्या मान्य : पाचव्या दिवशी १३ शेतकऱ्यांचे उपोषण सुटलेनवेगावबांध : नवेगावबांध जलाशयाच्या पाणीचोरी प्रकरणी पाच गावांतील १३ शेतकऱ्यांनी ६ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उपोषण सोडले.नवेगावबांध जलाशयाचे पाणी निस्तार पत्रकानुसार नवेगावबांध, देवलगाव, येरंडी, मुंगली व खोली या पाच गावांना ओलितासाठी लागू आहे. परंतु जलाशयाच्या वरच्या भागातील म्हणजे कोहळीटोली, रांजीटोला, धाबेपवनी, रामपुरी, येलोडी, जांभळी या गावातील काही शेतकऱ्यांनी जलाशयातील पाणी चोरी करुन अवैधपणे रबी धानपिक घ्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी तलावापासून तर आपल्या शेतापर्यंत मोठमोठ्या नाल्या खोदल्या. विजेच्या तारावर आकडे टाकून मोटारपंप सुरू केले. एवढेच नव्हे तर इतर लोकांना देखील पाणी विकण्याचा धंदा सुरू केला. तलावाच्या हद्दीत देखील अतिक्रमण करुन पीक घेण्याचा सपाटा यांनी सुरू केला होता.स्थानिक पाटबंधारे उपविभाग व वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी करून संबंधित पाणी चोरांवर वीज चोरांवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यावर्षी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे व पाणीचोरी सतत सुरू असल्यामुळे निस्तार हक्क प्राप्त शेतकऱ्यांचे रबी पीक धोक्यात येणार होते. त्यामुळे लाभार्थी पाच गावातील १३ शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. उपोषणकर्त्यांमध्ये धनराज पाटील डोंगरवार, जितेंद्र कापगते, माधोराव डोंगरवार, खुशाल काशिवार, योगराज पुस्तोडे, अमृत खुणे, गुलाब कापगते, रवि लंजे, हिरामण कापगते, भरत कापगते, मार्तंड डोंगरवार, मोहन सोनवाने, बालकदास बोरकर यांचा समावेश होता. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांनुसार अवैध खोदकाम करुन तयार करण्यात आलेला कालवा पूर्णपणे बुजविण्यात येईल व गट क्रमांक १२९२ मधील तलावाच्या परिसरात केलेले अतिक्रमण पूर्णपणे काढून सीमांकन करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले. तसेच तलावातील अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही विभागाने सांगण्यात आले. तसेच तलाव परिसरातील अवैध विद्युत जोडणी काढण्यात येऊन इतर ग्राहकांना देखील कारवाई करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीतर्फे देण्यात आला.दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाने अवैध कालवा बुजविण्याचे काम सुरू केले आहे. मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यामुळे मान्यवरांचे हस्ते लिंबू पाणी पिऊन उपोषण समाप्त करण्यात आले. यावेळी माजी आ.दयाराम कापगते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, पालकमंत्र्यांचे सचिव समीर बन्सोडे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन राठोड, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, मुलचंद गुप्ता, नवलकिशोर चांडक, विजय डोये, रतिराम कापगते, विलास कापगते, विलास पुस्तोडे, बाळकृष्ण डोंगरवार, वेल्हाळ डोंगरवार, भगीरथ डोंगरवार यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजले. (वार्ताहर)काही अनुत्तरित प्रश्नसुमारे एक फूट पाण्याची पातळी खाली जाईपर्यंत पाणी चोरण्यात आले, असा विभागाचा अंदाज आहे, याची भरपाई कुणी करावी?पाणी चोरी करण्यासाठी लहान मोठे सुमारे ३० कालवे खोदण्यात आले. सदर बाब गुगल मॅपवर पण दिसून येते. हे कालवे बुजविण्यासाठी पोकलँड व जेसीबी लावण्यात आले. प्रशासनाला सदर कामाला आलेल्या खर्चाची वसुली कोणाकडून करावी?सदर पाण्याची चोरी करण्यासाठी चोरीची वीज देखील वापरण्यात आली. वीज गळतीच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने तो अधिकार इतर ग्राहकांकडून वसूल देखील केला. सदरची अतिरिक्त वसुली कंपनी ग्राहकांना परत करणार काय?