शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जिल्ह्याच्या विकासासाठी १२९ कोटींची अतिरिक्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:14 IST

जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी १२९ कोटी रु पयांची अतिरिक्त मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली. वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दाखविली.

ठळक मुद्देराज्यस्तरीय नियोजन बैठक : निधी देण्यास अर्थमंत्री सकारात्मक, बैठकीत दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी १२९ कोटी रु पयांची अतिरिक्त मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली. वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दाखविली.नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि.१९) नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते. बैठकीला पालकमंत्री राजकुमार बडोले, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी, जिल्हा नियोजन अधिकारी एम.भूत व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सन २०१९-२० च्या आर्थिक वर्षासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी २३४ कोटी ४६ लाख रुपयांचे प्रस्ताव सादर केले होते. शासनाने १०५ कोटी २७ लाख रु पयांची मर्यादा आखून दिली होती. अतिरिक्त मागणीमध्ये प्रामुख्याने कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास कार्यक्र म, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा विकास, परिवहन रस्ते व पूल, सामान्य सेवा व आर्थिक सेवांचा समावेश आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अंमलबजावणी यंत्रणांनी १२९ कोटींची अतिरिक्त मागणी नोंदवली आहे. जिल्हा विकासासाठी हा निधी आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले.आरोग्य, शिक्षण व अंगणवाडी विकासाच्या सूचनाबैठकीत नामदार मुनगंटीवार यांनी, वाढीव निधीमधून आरोग्य सुविधा, शिक्षण व अंगणवाडी विकास या बाबींवर प्राधान्याने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी ४.५० कोटी देण्याचे कबूल केले. अंगणवाडी बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करु न देण्यात येईल असे ते म्हणाले. जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे असे सांगून त्यांनी धान क्लस्टर, मत्स्यव्यवसाय, कौशल्य विकास, रेशीम उत्पादन, बचत गटांचे सक्षमीकरण या बाबींना प्राधान्य देण्यात यावे. तसेच प्रत्येक तालुक्यात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालRajkumar Badoleराजकुमार बडोले