शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही.  प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा  पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत  असताना गावकऱ्यांनी पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले-रेंगेपार अंतर्गत जीतलाल अंबुले यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने तोड करण्यात आली.  शेतालगत असलेल्या कुरण जंगलातील झाडे अवैधरित्या कापण्यात आली. कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही.  प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा  पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत  असताना गावकऱ्यांनी पकडले. याप्रकरणी दोषी बीटरक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सविस्तर असे की, सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगल-रेंगेपार अंतर्गत येणाऱ्या जीतलाल अंबुले (रा. रेंगेपार) यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने कटाई करण्यात आली होती. शेताला लागून उत्तर दिशेला कुरण आहे. त्या जंगलातील सागवान झाडे अवैधरित्या कापून एकत्र ठेवली होती. मात्र, वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही.  अवैध वृक्षतोड प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. या संदर्भात क्षेत्रसहाय्यक कोसमतोंडी यांनी मला कसलीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले होते. मात्र, प्रकरण अंगलट येणार,  या भीतीपोटी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता लाकडे ट्रॅक्टरमध्ये भरली. ही माहिती रेंगेपार-पांढरीवासीयांना मिळताच गावकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला व वनकर्मचाऱ्यांच्या अवैध प्रकाराला नागरिकांनी उजेडात आणले. प्रकरणाविषयी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकाराला संबंधित वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बीटरक्षकांकडे हातोडा नेहमीच असायला पाहिजे. हातोडा न मारताच व पंचनामा न करताच लाकडे रात्रीच व तीही मध्यरात्री दरम्यानच का उचलण्यात आली. ही लाकडे सहवनक्षेत्रातच की अन्य इतरत्र नेऊन विल्हेवाट लावली जाणार होती असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, या लाकडांची माहिती संबंधित बीटरक्षकांना असून प्रकरण उजेडात आल्यानंतरच लाकडाची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने आखणी करण्यात आल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यामुळे यातील दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग