शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही.  प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा  पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत  असताना गावकऱ्यांनी पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगले-रेंगेपार अंतर्गत जीतलाल अंबुले यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने तोड करण्यात आली.  शेतालगत असलेल्या कुरण जंगलातील झाडे अवैधरित्या कापण्यात आली. कापलेली लाकडे घराजवळील रस्त्यापासून २०० मीटर अंतरावर ठेवण्यात आली होती. बराच कालावधी लोटूनसुद्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई करण्यात आली नाही.  प्रकरण उजेडात येताच वनविभाग जागा झाला व शुक्रवारी (दि. १८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास सुमारे १५ वनकर्मचाऱ्यांनी ती लाकडे कुठल्याही प्रकारचा  पंचनामा न करता व हातोडा न मारता, ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र नेत  असताना गावकऱ्यांनी पकडले. याप्रकरणी दोषी बीटरक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सविस्तर असे की, सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र कोसमतोंडी बीट गोंगल-रेंगेपार अंतर्गत येणाऱ्या जीतलाल अंबुले (रा. रेंगेपार) यांच्या शेतातील सागवान झाडाची विना परवानगीने कटाई करण्यात आली होती. शेताला लागून उत्तर दिशेला कुरण आहे. त्या जंगलातील सागवान झाडे अवैधरित्या कापून एकत्र ठेवली होती. मात्र, वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही.  अवैध वृक्षतोड प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. या संदर्भात क्षेत्रसहाय्यक कोसमतोंडी यांनी मला कसलीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले होते. मात्र, प्रकरण अंगलट येणार,  या भीतीपोटी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१८) रात्री १ वाजण्याच्या सुमारास कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता व हातोडा न मारता लाकडे ट्रॅक्टरमध्ये भरली. ही माहिती रेंगेपार-पांढरीवासीयांना मिळताच गावकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला व वनकर्मचाऱ्यांच्या अवैध प्रकाराला नागरिकांनी उजेडात आणले. प्रकरणाविषयी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकाराला संबंधित वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बीटरक्षकांकडे हातोडा नेहमीच असायला पाहिजे. हातोडा न मारताच व पंचनामा न करताच लाकडे रात्रीच व तीही मध्यरात्री दरम्यानच का उचलण्यात आली. ही लाकडे सहवनक्षेत्रातच की अन्य इतरत्र नेऊन विल्हेवाट लावली जाणार होती असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, या लाकडांची माहिती संबंधित बीटरक्षकांना असून प्रकरण उजेडात आल्यानंतरच लाकडाची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने आखणी करण्यात आल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यामुळे यातील दोषी वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग