शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:25 IST

शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती मोहीम : १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्ह्यात दरवर्षी रस्ते अपघातात दीडशे मोटारसायकल चालकांचा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे मृत्यु होतो. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे सर्वाधिक मृत्यु होत असल्याची बाब देखील पुढे आली आहे. तर पालक आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हाती मोटारसायकल देतात. त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्यामुळेच अपघातात घडतात.दरम्यान जिल्ह्यातील अपघाताच्या घटनांचा वाढता ग्राफ कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी शहर आणि ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेदरम्यान वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व हेल्मेटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.शहरात आत्तापर्यंत शेकडो वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तर १२ नोव्हेबंरपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती मोहीमेतंर्गत तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे मोटारसायकल चालकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.देवरी येथे मोटारसायकल जप्तदेवरी येथे हेल्मेट सक्ती मोहीमेतंर्गत गुरूवारी (दि.१५) मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणाºया वाहन चालकाच्या ४० ते ५० मोटारसायकल जप्त करुन देवरी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.सक्ती ठीक मात्र गुणवत्तेकडे दुर्लक्षजिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी व वाढते अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. मोहीम योग्य असली तरी हेल्मेटच्या गुणवत्तेकडे मात्र या विभागासह वैद्यमानशास्त्र विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. विक्रेते सक्तीचा फायदा घेत आयएसआय मार्क व गुणवत्ता नसलेल्या हेल्मेटची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर केल्यानंतरही गुणवत्ताहिन हेल्मेटमुळे एखाद्या वाहन चालकाचा मृत्यु झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाहतुकीची कोंडी कायमवाहतूक नियंत्रण विभागाची सर्व यंत्रणा सध्या हेल्मेट सक्ती मोहीमेत व्यस्त आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले असून शहरातील वाहतुकीची कोंडी कायम आहे. शहरातील बाजारपेठ परिसरात राबविण्यात आलेला वन वे पार्किंगचा प्रयोग देखील पूर्णपणे फसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे सुध्दा या विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस