शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

एसीबीच्या दक्षता जागृती सप्ताहाची सांगता

By admin | Updated: November 1, 2014 23:10 IST

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची शनिवारी (दि.१) सांगता करण्यात आली.

गोंदिया : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची शनिवारी (दि.१) सांगता करण्यात आली. २७ आॅक्टोबर रोजी सदर सप्ताहाची सुरुवात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात भ्रष्ट्राचार निर्मूलनाबाबत घेण्यात आलेल्या शपथविधीने करण्यात आली. याअंतर्गत कार्यालयाच्यावतीने जनसामान्यात भ्रष्टाचाराबाबत जागृती करण्याकरिता कार्यालय व कार्यपद्धतीविषयी माहिती देणारे फलक जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात लावण्यात आल होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकरिता नव्याने सुरुवात करण्यात आलेला टोल फ्री क्रमांक २०१४ हा सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याकरिता याबाबतची पत्रके जिल्ह्यातील तसेच सर्व तालुक्यातील बसेस, खासगी वाहने व गावागावांत लावण्यात आली. ग्रामीण भागात टोल फ्री क्रमांक २०६४ च्या प्रचार व प्रसारासाठी आठवडी बाजाराचे दिवशी पत्रके वाटण्यात आली. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना विभाग व त्याची कार्यपद्धतीबाबत समजावून सांगण्यात आले.भ्रष्टाचारबाबत जनजागृतीकरिता ग्रामपंचायत पातळीवरही कार्यक्रम घेण्यात आले. ग्रामपंचायत कामठा येथे ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, सामाजिक संघटना व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्यामार्फत आजूबाजूच्या परिसरातील अधिकाधिक लोकापर्यंत भ्रष्टाचार निर्मूलनात लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.तर शनिवारी (दि.१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात यशस्वी सापळा कारवाईकरिता तक्रार देणाऱ्या तक्रारदारांचा स्वातंत्र संग्राम सेनानी महादेवराव बिडवाईकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या तक्रारदारांप्रमाणेच ईतरही नागरिक अधिकाधिक संख्येने भ्रष्टाचार विरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा यावेळी बिडवाईकर यांनी व्यक्त केली. विभागाने २०१४ मध्ये आतापर्यंत एकूण १९ यशस्वी कारवाया केल्या आहेत हे विशेष. याप्रसंगी विभागाचे उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांनी, भ्रष्टाचारविरोधात तक्रार देण्यासाठी अधिकाधिक संख्येने नागरिकांनी पुढे यावे. त्यांना याबाबत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांक २०६४ वर संपर्क साधावा. लाचेच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर तक्रारदारांचे संबंधित कार्यालयात प्रलंबित असलेले काम विभाग पूर्ण करुन देण्यास सहकार्य करेल असे आवाहन आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)